शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

दिग्रसच्या शेतकऱ्यांना पीक पंचनाम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

तालुक्यातील संपूर्ण पंचनामे करण्यासाठी १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतातच पीक कसे ठेवायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सवड नाही. राजकीय कलगीतुऱ्यात गुरफटलेल्या सरकारला याचे सोयरसूतक नाही.

ठळक मुद्देप्रशासन उदासीन : परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : परतीच्या पावसाने तालुक्यात कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेल्या सोयाबीनला आता उग्र वास सुटला आहे. मात्र महसूल व कृषी विभाग पंचनाम्याची प्रक्रिया कासवगतीने करीत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि भरपाई कधी मिळणार, या विवंचनेत कास्तकार सापडले आहे.तालुक्यातील संपूर्ण पंचनामे करण्यासाठी १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतातच पीक कसे ठेवायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सवड नाही. राजकीय कलगीतुऱ्यात गुरफटलेल्या सरकारला याचे सोयरसूतक नाही.एकीकडे जमिनीतील जास्त ओलाव्यामुळे रबीचा हंगाम दूर जाणार असल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे कास्तकार मदत कशी व कुठून मिळेल, या विचारचक्रात गुरफटला आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शनाबाबत कोणताच दिलासा देऊ शकला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा एकाकी पडल्याचे चित्र आहे. अनेक गावात कास्तकारांनी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामा करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री किसान योजनेतील सन्मान निधीच्या वितरणातील त्रुटी कास्तकारांचा सन्मान कमी, अपमानच अधिक करत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे केवळ नाटक न करता सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.लोकप्रतिनिधी आहेत कुठे ?तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. अशावेळी या मतदारसंघाचे खासदार, आमदार कुठे आहेत, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे. लोकप्रतिनिधींचे कास्तकारांकडे झालेले दुर्लक्ष व कृषी प्रशासनावर त्यांचा फुसका दबाव कास्तकारांमध्ये रोष वाढवित आहे. एकंदरीत सरकार स्थापनेतील कलगीतुऱ्यात शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे शेतकरी राजकीय पक्षांना हिसका दाखविण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती