शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सिंचन विहीर गैरप्रकारात जबाबदारी निश्चित करा

By admin | Updated: June 28, 2015 00:12 IST

धडक सिंचन विहीर योजनेत गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी फिक्स करून त्यांच्याकडून ..

सचिंद्र प्रताप सिंग : खचलेल्या विहिरींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश यवतमाळ : धडक सिंचन विहीर योजनेत गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी फिक्स करून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी शनिवारी येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन विहीर योजनेचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी येथील बचत भवनात आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही केवळ ३५ टक्के विहिरी पूर्ण झाल्याचे पुढे आले तर काही विहिरी परस्पर विकल्याचे दिसून आले. तसेच खचलेल्या विहिरींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. धडक सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभागाकडे पालकत्व देण्यात आले होते. धडक सिंचन विहिरीसोबतच नरेगाच्या विहिरींचा ही या बैठकीत आढावा घेण्यात आला. पाच हजार ७०२ विहिरींपैकी २०६ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. यासाठी आठ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. कुशल आणि अकुशल नियमात बील अडकल्याने अनेक विहिरी अपूर्ण राहिल्याचे यावेळी पुढे आले. धडक सिंचन विहीर मंजूर झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी अडचणीमुळे शेत विकले. याप्रकरणात सातबारा ज्यांच्या नावावर होता त्यांना पैसे देण्याचे आदेश आहे. प्रत्यक्षात शेत विकल्यावर शेतकऱ्याला लाभ दिला गेला. या प्रकरणात जिल्हाधिंकाऱ्यांनी संबंधितांवर जबाबदारी फिक्स करून वसुली करण्याचे आदेश दिले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची सूचना दिली. २०१३-१४ च्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत १३ हजार ८०४ विहिरी खचल्या होत्या. त्यापैकी १० हजार ९८४ विहिरींचे अर्ज पंचायत समितीकडे आले होते. यामधील दोन हजार ७९५ लाभार्थी पात्र ठरले. ९७९ विहिरींना बांंधकामाची परवानगी मिळाली. या विहिरी खचल्या कशा यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संयश व्यक्त केला. संबंधित तलाठ्या मार्फत कृषी सहाय्यकाच्यावतीने त्याचे फेर सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी भाकरे यांच्यासह १६ तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिाकरी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)गावपातळीवर काम द्याजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध आहे. त्यांना गावपातळीवर काम देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसामुळे नुकसान होणाऱ्या गावांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. याठिकाणी नाला खोलीकरण, डाळीचे बांध तयार करावे तसेच या कामात कंत्राटदारांना तूर ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिले.