शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

प्राधिकरणाच्या वादग्रस्त अभियंत्याला हटविले

By admin | Updated: June 18, 2014 00:27 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागाचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. वरिष्ठांचे आदेशही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले जात नाही. एवढेच नव्हे तर कार्यकारी

यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागाचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. वरिष्ठांचे आदेशही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले जात नाही. एवढेच नव्हे तर कार्यकारी अभियंत्यांकडून सहकारी वादग्रस्त अधिकाऱ्यांची पाठराखण केली जाते. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच या अधिकाऱ्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. मात्र ज्यांच्याकडे हा पदभार देण्याचे आदेश आहे, त्या अधिकाऱ्यानेही पदभार स्वीकारण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. या प्रकारात जनतेचे मात्र हाल होत आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा सुरळीत आणि नियमित व्हावा यासाठीची जबाबदारी उपविभागीय अभियंत्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र या अधिकाऱ्याकडून ही जबाबदारी पार पाडली जात नाही. प्राधिकरणावर एप्रिल आणि मे महिन्यात हजारो नागरिक धडकले. नियोजन आणि समन्वयाअभावी निर्माण झालेली परिस्थिती प्राधिकरणाच्या ठाणे येथील मुख्य अभियंत्यापर्यंत पोहोचली. त्यांनी दिलेल्या आदेशावरून अधीक्षक अभियंत्यांनी उपविभागीय अभियंता एस.एम. दारव्हेकर यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, येथील कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. एवढेच नव्हे तर यवतमाळचा पाणीप्रश्न मिटला असून मोर्चेही थांबल्याचे मुख्य अभियंत्यांना एका पत्राद्वारे कळविले होते. वास्तविक आजही यवतमाळकरांना अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मुख्य अभियंत्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी ९ जून रोजी येथील कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क करून दारव्हेकर यांचा कार्यभार काढण्याचे आदेश दिले. यावरून कार्यकारी अभियंत्यांनी दारव्हेकर यांनी आपला कार्यभार उपकार्यकारी अभियंता डी.एस. देशकर यांच्याकडे द्यावा, असा आदेश येथील कार्यकारी अभियंत्यांनी काढला. मात्र दारव्हेकर यांनी कार्यभार सोडला नाही तर देशकर यांनीही स्वीकारला नाही. यावरून सदर कार्यालयाचे अधिकारी वरिष्ठांचा आदेशही जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. यात मात्र शहरातील जनता भरडली जात आहे. आता तिसऱ्याकडे जबाबदारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)