शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

पैनगंगा नदी तीरावरील गावात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: July 20, 2014 00:11 IST

उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी

उमरखेड (कुपटी) : उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंब स्थलांतरणाच्या तयारी आहे. हे भयावह चित्र तालुक्यात दिसत आहे. सर्वत्र कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा हाहाकार झाला आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी तीरावर जवळपास ५० गाव आहेत. या गावांना पावसाळ्यात पुराचा तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा चटका सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे आताही पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पात्रात जेमतेम पाणी होते तेही पूर्णपणे आटले आहे. जून महिना संपून जुलै संपण्याच्या मार्गावर आहे. तरी वरुण राजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाऊस आलाच नाही. पावसाचे पाणी नसल्यामुळे नदी आटली. त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली आहे. या भागातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी आटले आहे. याचा परिणाम नदी तिरावरील गावातील पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. अनेक गावातील नळ योजना कुचकामी ठरली आहेत. पैनगंगा नदी तीराबरोबरच इतर गावातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जवळपास ७० गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. प्रशासनाने कृती आराखडा तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. पण त्यावर कायम उपाययोजना केली जात नाही. तालुक्यातील झाडगाव, तिवरंग, हातला, दिवटपिंप्री, पळशी, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, लोहरा, कारखेड, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, ब्राह्मणगाव, सोईट, ढाणकी, गाजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिरंजी, करंजी, बिटरगाव, भोजनगर, तरोडा, धनज, धानोरा, हरदडा, वांगी, बिटरगाव, बोथा (वन), चिल्ली या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट झाला आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने जलस्रोत संपुष्टात आले आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र रुप धारण करीत आहे. गावकऱ्यांसोबतच वन्य जीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पैनगंगा अभयारण्यात वनविभागाने पाणवठे निर्माण केले. पण त्यामध्ये पाणी नाही. त्यामुळे वन्यजीव गावकुसाकडे चाल करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच याचा परिणाम जवराळा येथील २० वर्षीय युवकावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. (वार्ताहर)