शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पैनगंगा नदी तीरावरील गावात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: July 20, 2014 00:11 IST

उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी

उमरखेड (कुपटी) : उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंब स्थलांतरणाच्या तयारी आहे. हे भयावह चित्र तालुक्यात दिसत आहे. सर्वत्र कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा हाहाकार झाला आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी तीरावर जवळपास ५० गाव आहेत. या गावांना पावसाळ्यात पुराचा तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा चटका सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे आताही पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पात्रात जेमतेम पाणी होते तेही पूर्णपणे आटले आहे. जून महिना संपून जुलै संपण्याच्या मार्गावर आहे. तरी वरुण राजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाऊस आलाच नाही. पावसाचे पाणी नसल्यामुळे नदी आटली. त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली आहे. या भागातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी आटले आहे. याचा परिणाम नदी तिरावरील गावातील पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. अनेक गावातील नळ योजना कुचकामी ठरली आहेत. पैनगंगा नदी तीराबरोबरच इतर गावातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जवळपास ७० गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. प्रशासनाने कृती आराखडा तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. पण त्यावर कायम उपाययोजना केली जात नाही. तालुक्यातील झाडगाव, तिवरंग, हातला, दिवटपिंप्री, पळशी, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, लोहरा, कारखेड, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, ब्राह्मणगाव, सोईट, ढाणकी, गाजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिरंजी, करंजी, बिटरगाव, भोजनगर, तरोडा, धनज, धानोरा, हरदडा, वांगी, बिटरगाव, बोथा (वन), चिल्ली या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट झाला आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने जलस्रोत संपुष्टात आले आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र रुप धारण करीत आहे. गावकऱ्यांसोबतच वन्य जीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पैनगंगा अभयारण्यात वनविभागाने पाणवठे निर्माण केले. पण त्यामध्ये पाणी नाही. त्यामुळे वन्यजीव गावकुसाकडे चाल करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच याचा परिणाम जवराळा येथील २० वर्षीय युवकावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. (वार्ताहर)