शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: May 22, 2016 02:06 IST

तालुक्यातील ग्रामीण भाग पाण्यासाठी तडफडत आहे. मे हिटच्या तडाख्यात पाण्याची पातळी प्रचंड घटल्यामुळे पाण्याचा थेंबही मिळणे दुरापास्त झाले आहे.

मे हीटचा तडाखा : विहिरी, बोअरवेल कोरड्या, १२ गावांत ११ टँकर पुसद : तालुक्यातील ग्रामीण भाग पाण्यासाठी तडफडत आहे. मे हिटच्या तडाख्यात पाण्याची पातळी प्रचंड घटल्यामुळे पाण्याचा थेंबही मिळणे दुरापास्त झाले आहे. ठिकठिकाणच्या विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडल्या असून १२ गावात ११ टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. पुसद तालुक्यात १८० गावे व ११९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. विदर्भात पुसद शहर आणि तालुका प्रचंड तापमानासाठी प्रसिद्ध आहे. यंदाही तालुक्यातील नागरिकांना मे हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे जाणवत आहे. ४ मे रोजी आलेल्या वादळी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. परंतु त्यानंतर जणू सूर्य आगच ओकू लागला आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे तालुक्यातील विहिरी, नाले, बोअरवेल असे सर्वच जलस्त्रोत कोरडे पडले आहे. पंचायत समितीस्तरावरून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू आहे. नवीन विंधन विहीर, नळयोजना, विशेष दुरुस्ती, खासगी विंधन विहीर अधिग्रहण करणे आदी कामांसाठी तब्बल ८० लाख रुपयांच्या निधीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. सध्या तालुक्यातील १२ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये कारला (देव), अनसिंग, म्हैसमाळ, पन्हाळा, कृष्णनगर, येलदरी, उल्हासवाडी, उपवनवाडी, बाळवाडी, बुटी, वडसद, मारवाडी खु. आदी गावांचा समावेश आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी तहानलेली जनता करीत आहे. (प्रतिनिधी)पूस धरणातील साठा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही कमीपुसद : सरासरी पाऊस होणाऱ्या पुसद तालुक्यात जलसाठा करण्यासाठी शासनाने तीन धरणे व अनेक लघु पाटबंधारे तसेच शेततळी बांधण्यात आली. शहरासह तालुक्याची तहान भागेल, असा विक्रमी जलसाठा तालुक्यातील धरणात होतो. तालुक्याला हंडामुक्त करण्याच्या उद्देशाने शासनाने विविध योजनांमधून प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. तरी अनेक योजना फक्त कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून निधी हडप केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. वनवार्ला, इसापूर, वेणी येथे धरणे असून या धरणात चांगला जलसाठा होता. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही धरणे भरली नसली तरी असलेला जलसाठा सिंचन व पिण्यासाठी पुरेसा होता. मात्र पूस धरणातून शासनाने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाण्याचा मोठा विसर्ग केल्याने नववर्षाच्या प्रारंभीच पूस धरणात केवळ २० टक्के एवढाच जलसाठा होता. त्यानंतर शिल्लक पाण्यावर तालुक्याची भिस्त असताना धरणाने तळ गाठला. पाऊस कमी पडला तर १९७२ च्या दुष्काळाचे उदाहरण जुन्या जाणत्यांकडून दिले जाते. माणसे पाणी-पाणी करत मृत्यू पावल्याचे सांगितले जाते. या दुष्काळाच्या काळात पुसद परिसरात पूस धरण वगळता मोठे धरण नव्हते. तसेच त्यावेळी पाण्याची मागणीही तुलनेने कमी होती. सध्या पूस धरणात दोन टक्के जलसाठा आहे. १९७२ च्या दुष्काळातदेखील या धरणाचा जलसाठा एवढा घटला नव्हता. त्या तुलनेत आता पाण्याची मागणीही प्रचंड वाढली आहे. या परिस्थितीमुळे पुसदकरांना पहिल्यांदाच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याला पूर्णत: प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. योग्य नियोजन नसल्याने जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुसद गावात यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्याईने पूस धरणाची निर्मिती झालेली असतानाही नागरिकांना या धरणाचे पाणी पुरत नाही. (तालुका प्रतिनिधी)