शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: May 22, 2016 02:06 IST

तालुक्यातील ग्रामीण भाग पाण्यासाठी तडफडत आहे. मे हिटच्या तडाख्यात पाण्याची पातळी प्रचंड घटल्यामुळे पाण्याचा थेंबही मिळणे दुरापास्त झाले आहे.

मे हीटचा तडाखा : विहिरी, बोअरवेल कोरड्या, १२ गावांत ११ टँकर पुसद : तालुक्यातील ग्रामीण भाग पाण्यासाठी तडफडत आहे. मे हिटच्या तडाख्यात पाण्याची पातळी प्रचंड घटल्यामुळे पाण्याचा थेंबही मिळणे दुरापास्त झाले आहे. ठिकठिकाणच्या विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडल्या असून १२ गावात ११ टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. पुसद तालुक्यात १८० गावे व ११९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. विदर्भात पुसद शहर आणि तालुका प्रचंड तापमानासाठी प्रसिद्ध आहे. यंदाही तालुक्यातील नागरिकांना मे हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे जाणवत आहे. ४ मे रोजी आलेल्या वादळी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. परंतु त्यानंतर जणू सूर्य आगच ओकू लागला आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे तालुक्यातील विहिरी, नाले, बोअरवेल असे सर्वच जलस्त्रोत कोरडे पडले आहे. पंचायत समितीस्तरावरून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू आहे. नवीन विंधन विहीर, नळयोजना, विशेष दुरुस्ती, खासगी विंधन विहीर अधिग्रहण करणे आदी कामांसाठी तब्बल ८० लाख रुपयांच्या निधीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. सध्या तालुक्यातील १२ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये कारला (देव), अनसिंग, म्हैसमाळ, पन्हाळा, कृष्णनगर, येलदरी, उल्हासवाडी, उपवनवाडी, बाळवाडी, बुटी, वडसद, मारवाडी खु. आदी गावांचा समावेश आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी तहानलेली जनता करीत आहे. (प्रतिनिधी)पूस धरणातील साठा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही कमीपुसद : सरासरी पाऊस होणाऱ्या पुसद तालुक्यात जलसाठा करण्यासाठी शासनाने तीन धरणे व अनेक लघु पाटबंधारे तसेच शेततळी बांधण्यात आली. शहरासह तालुक्याची तहान भागेल, असा विक्रमी जलसाठा तालुक्यातील धरणात होतो. तालुक्याला हंडामुक्त करण्याच्या उद्देशाने शासनाने विविध योजनांमधून प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. तरी अनेक योजना फक्त कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून निधी हडप केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. वनवार्ला, इसापूर, वेणी येथे धरणे असून या धरणात चांगला जलसाठा होता. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही धरणे भरली नसली तरी असलेला जलसाठा सिंचन व पिण्यासाठी पुरेसा होता. मात्र पूस धरणातून शासनाने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाण्याचा मोठा विसर्ग केल्याने नववर्षाच्या प्रारंभीच पूस धरणात केवळ २० टक्के एवढाच जलसाठा होता. त्यानंतर शिल्लक पाण्यावर तालुक्याची भिस्त असताना धरणाने तळ गाठला. पाऊस कमी पडला तर १९७२ च्या दुष्काळाचे उदाहरण जुन्या जाणत्यांकडून दिले जाते. माणसे पाणी-पाणी करत मृत्यू पावल्याचे सांगितले जाते. या दुष्काळाच्या काळात पुसद परिसरात पूस धरण वगळता मोठे धरण नव्हते. तसेच त्यावेळी पाण्याची मागणीही तुलनेने कमी होती. सध्या पूस धरणात दोन टक्के जलसाठा आहे. १९७२ च्या दुष्काळातदेखील या धरणाचा जलसाठा एवढा घटला नव्हता. त्या तुलनेत आता पाण्याची मागणीही प्रचंड वाढली आहे. या परिस्थितीमुळे पुसदकरांना पहिल्यांदाच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याला पूर्णत: प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. योग्य नियोजन नसल्याने जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुसद गावात यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्याईने पूस धरणाची निर्मिती झालेली असतानाही नागरिकांना या धरणाचे पाणी पुरत नाही. (तालुका प्रतिनिधी)