शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

तीव्र इंद्रियासक्ती मानवाला ध्येयापासून दूर नेते

By admin | Updated: August 18, 2014 23:49 IST

काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक

उमरखेड : काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक आणि राम कथाकार सुश्री आशाश्री दाणी यांनी येथे केले. हनुमान मंदिर संस्थान आणि रामभक्त मंडळींच्यावतीने आयोजित श्रीराम कथा पर्वातील प्रथम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. श्रावण मास व पर्यावरण संतुलनासाठी आयोजित करण्यात आलेले हे कथापर्व २३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. आपल्या अभ्यासपूर्ण आणि सुश्राव्य वाणीतून आशाश्रींनी श्रीराम कथा भाविकांना सांगितली. मानवाचे शरीर हाडामांसाचे एक गाठोडे आहे. तीव्र इंद्रियासक्ती आणि भोगलालसेमुळे मानव आपल्या मूळ स्वरूपाला विसरुन प्रपंचरुपी नदीमध्ये सतत गटांगळ्या खातो त्यामुळे तो परमार्थी ऊर्जेला मुकत चालला आहे.मानवाने सत्कर्मे आचरली आणि भोगलालसेपासून इंद्रियांना आवर घातली तर नराचा नारायण होतो.सुख दु:खापासून मुक्ती मिळू शकते. तुलसी-रामायणाच्या कथेचा हाच उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येकाने रामकथा आवर्जून ऐकली पाहिजे. तुलसी-रामायणाचा जन्मच मुळी आसक्ती विरोधातून झाला आहे. पत्नीच्या प्रेमामुळे आसक्त झालेल्या तुलसीदासांना ग्लानी आली होती. अहोरात्र पत्नीचे चिंतन व तिच्या विषयीच्या तीव्र आसक्तीने सैरभैर झालेल्या तुलसीदासांना त्यांच्या पत्नीनेच दिव्य उपदेश केला आणि पारलौकिक वाटेवर चालण्यास भाग पाडले, असे त्यांनी सांगितले. रामकथा श्रवण करण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)