शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

दिग्रसमध्ये भूजल पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 21:50 IST

यावर्षीच्या अपुºया पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकट : अरूणावती धरणात केवळ २२ टक्केच पाणीसाठा

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षीच्या अपुºया पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे आहे.तालुक्यात अरूणावती धरण आहे. मात्र अपुºया पावसामुळे या धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यात ३३ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तथापि अपुºया पावसामुळे यावर्षी बहुतांश पिके संकटात सापडली. परिणामी सोयाबीन उतारा कमी येत आहे. कपाशीवरही विविध कीडींनी आक्रमण केल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यातच फवारणीतून विषबाधा होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस पडण्याचे संकेत दिले होते. मात्र आत्तापर्यंत तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४७ टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी तालुक्यात आत्तापर्यंत ४७३ मिमी पाऊस कोसळला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस तब्बल ३०१ मिमीने कमी आहे. पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील नदी-नाले कोरडे आहेत. अरूणावती धरणातही मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे शेतातील विहिरींनाही पुरेसे पाणी आले नाही.अपुºया पावसामुळे पिकांची स्थितीही चिंताजनक आहे. त्यातच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शेतातील विहिरींना पाणी नसल्याने पिकांना ओलित करणेही कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे. सोबतच उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळत आहे.रबी हंगाम संकटात, सिंचनाची समस्याअपुºया पावसामुळे खरिपानंतर रबी हंगामही संकटात सापडला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी रबी हंगामात गहू व हरभºयाची लागवड करतात. मात्र यावर्षी भूजल पातळी खालावल्याने शेतातील विहिरींना मोजकेच पाणी असल्याने शेतकºयांना सिंचनाची समस्या सतावत आहे. खरिपातील तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रबी पिकांची लागवड करून जादा उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. भूजल पातळी खालावल्याने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे.