शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

दिग्रसमध्ये भूजल पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 21:50 IST

यावर्षीच्या अपुºया पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकट : अरूणावती धरणात केवळ २२ टक्केच पाणीसाठा

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षीच्या अपुºया पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे आहे.तालुक्यात अरूणावती धरण आहे. मात्र अपुºया पावसामुळे या धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यात ३३ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तथापि अपुºया पावसामुळे यावर्षी बहुतांश पिके संकटात सापडली. परिणामी सोयाबीन उतारा कमी येत आहे. कपाशीवरही विविध कीडींनी आक्रमण केल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यातच फवारणीतून विषबाधा होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस पडण्याचे संकेत दिले होते. मात्र आत्तापर्यंत तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४७ टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी तालुक्यात आत्तापर्यंत ४७३ मिमी पाऊस कोसळला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस तब्बल ३०१ मिमीने कमी आहे. पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील नदी-नाले कोरडे आहेत. अरूणावती धरणातही मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे शेतातील विहिरींनाही पुरेसे पाणी आले नाही.अपुºया पावसामुळे पिकांची स्थितीही चिंताजनक आहे. त्यातच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शेतातील विहिरींना पाणी नसल्याने पिकांना ओलित करणेही कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे. सोबतच उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळत आहे.रबी हंगाम संकटात, सिंचनाची समस्याअपुºया पावसामुळे खरिपानंतर रबी हंगामही संकटात सापडला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी रबी हंगामात गहू व हरभºयाची लागवड करतात. मात्र यावर्षी भूजल पातळी खालावल्याने शेतातील विहिरींना मोजकेच पाणी असल्याने शेतकºयांना सिंचनाची समस्या सतावत आहे. खरिपातील तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रबी पिकांची लागवड करून जादा उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. भूजल पातळी खालावल्याने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे.