शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

कापसाचे उत्पादन घटल्याने आणेवारी पुन्हा बदलणार

By admin | Updated: November 14, 2015 02:40 IST

जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात बरीच घट झाल्याचे दिसत आहे. कापसाचा वेचा अपेक्षेनुसार नाही.

आठ तालुक्यांच्या नजरा : अंतिम आणेवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा यवतमाळ : जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात बरीच घट झाल्याचे दिसत आहे. कापसाचा वेचा अपेक्षेनुसार नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम पीक आणेवारीत उर्वरित आठ पैकी किती तालुक्यांना बदलाचा दिलासा मिळतो, याकडे नजरा लागल्या आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम दाखवून शासनाने नजर पीक आणेवारीत केवळ वणी तालुक्यातील दोन गावांची स्थिती गंभीर दाखविली होती. उर्वरित सर्व गावांमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण केले गेले. मात्र या चुकीच्या आणेवारी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे तर सत्ताधारी भाजपा-सेनेनेही नाराजी व्यक्त केली. पीक काढण्याच्या पद्धतीबाबत आमदार मनोहरराव नाईक यांच्यासह पालकमंत्र्यांनीही असमाधान नोंदविले. त्यानंतर सुधारित पीक आणेवारी जाहीर केली गेली. त्यात १६ पैकी आठ तालुक्यात आणेवारी ५० टक्क्या पेक्षा कमी नोंदविली गेली. मात्र उर्वरित आठ तालुक्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र सारखा पाऊस झाला असताना कुठे आणेवारी कमी आणि कुठे जास्त का असा प्रश्न उपस्थित केला गेला. जेथे ५० टक्क्यापेक्षा जास्त आणेवारी दाखविली गेली तेथील पिकांची स्थितीसुद्धा बिकट आहे. कापसाचे अपेक्षित उत्पादन झालेले नाही. कोरडवाहू शेतकरी तर नुकसानीच्या खाईत लोटला गेल्याचे चित्र आहे. कापसाचा पहिलाच वेचा प्रभावित झाला. त्यात अपेक्षेनुसार उत्पादन झाले नाही. त्यामुळे या घटलेल्या कापूस उत्पादनाची दखल अंतिम पीक आणेवारी जाहीर करताना घेतली जाणार असल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आठ पैकी आणखी काही तालुक्यांची पीक आणेवारी ५० पैशापेक्षा कमी नोंदविली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच या आठ तालुक्यातील जनतेच्या नजरा १५ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या अंतिम पीक आणेवारीकडे लागल्या आहेत. कापूस उत्पादनाच्या आधारे कृषी व महसूलची यंत्रणा त्या आठ तालुक्यातील पीक आणेवारीचा फेरआढावा घेत असल्याचे सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)