शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
3
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
4
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
5
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
6
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
7
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
8
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
9
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
10
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
11
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
12
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
13
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
14
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
15
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
16
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
17
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
18
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
19
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
20
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी याद्यांचे आता होणार चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:42 IST

कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट केले जाणार आहे. गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देमुदतवाढ अशक्य : ६६ कलमी अर्जासाठी लागणार आठवडा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट केले जाणार आहे. गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. यामुळे दिवळीपूर्वी कर्जाची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता दुरावली आहे.जिल्ह्यातील तीन लाख ६७ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असल्याचा अंदाज राज्य शासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात दोन लाख ५० हजार ३८६ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अद्यापही या प्रक्रियेतून जिल्ह्यातील एक लाख १७ हजार शेतकरी बाहेर असल्याचे स्पष्ट होत आहे. या शेतकºयांना कर्जमाफी मिळणे अशक्य झाले आहे. अर्ज दाखल न केलेल्या शेतकºयांनी अद्यापही मुदतवाढीची कोणतीही मागणी शासन अथवा प्रशासनाकडे केली नसल्याचा दावा यंत्रणेने केला.दुसरीकडे बँकांकडून कर्जमाफी अर्जासंदर्भात ६६ कलमांमध्ये आॅनलाईन अहवाल मागविण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक बँकांच्या शाखांकडे संगणक नाही. त्यामुळे कच्ची यादी तयार करून ही माहिती संगणकावर फिड करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत आॅडीट संपवण्याच्या सूचना शासनस्तरावरून होत्या. प्रत्यक्षात बँक स्तरावरील काम खोळंबले आहे. त्यासाठी आणखी आठ दिवस लागणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.शेतकºयांचे अर्ज आणि बँकांची यादी जुळल्यानंतर यादीचे चावडी वाचन होईल. यात गावपातळीवरून काही अडचणी आल्यास त्या सोडविल्या जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.३३ आॅडीटरवर साडेतीन लाख खात्यांचा भारजिल्ह्यात केवळ ३३ शासकीय आॅडीटर (लेखा परीक्षक) आहे. या तोकड्या लेखा परीक्षकांवर तीन लाख ६७ हजार शेतकºयांचे खात्यांचे आॅॅडीट करण्याचा भार पडला आहे. त्यामुळे मुदतीत त्यांनाही सर्व खात्यांची तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यांनाही आणखी आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. लेखा परीक्षकांची संख्या तोकडी असल्याने पुढील आठ दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल किंवा नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. या सर्व बाबींमुळे दिवाळीपूर्वी माफीची रक्कम खात्यात जमा होणे दुरापास्त झाले आहे.सभासद अंधारातचकर्जमाफीसाठी केवळ थकबाकीदार शेतकरी पात्र आहेत, असा गैरसमज गावपातळीवर आहे. मात्र नियमित खातेधारकालाही आॅनलाईन अर्ज भरायचे होते, याची माहिती त्यांना नव्हती. यामुळे हजारो नियमित खातेधारकांचे अर्ज सबमिटच झाले नाही.राज्यातील ५६ लाख खातेधारकांनी आॅनलाईन नोंद केली. बँक स्तरावरचे कामकाज आटोपल्यानंतर सोशल आॅडीट होईल. नंतर कर्जमाफीची पुढील प्रक्रिया होईल. सध्या मुदतवाढीसाठी सूचना नाही.- विजय झाडेसहकार आयुक्त, पुुणे