शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

कर्जमाफी याद्यांचे आता होणार चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:42 IST

कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट केले जाणार आहे. गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देमुदतवाढ अशक्य : ६६ कलमी अर्जासाठी लागणार आठवडा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट केले जाणार आहे. गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. यामुळे दिवळीपूर्वी कर्जाची रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता दुरावली आहे.जिल्ह्यातील तीन लाख ६७ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असल्याचा अंदाज राज्य शासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात दोन लाख ५० हजार ३८६ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अद्यापही या प्रक्रियेतून जिल्ह्यातील एक लाख १७ हजार शेतकरी बाहेर असल्याचे स्पष्ट होत आहे. या शेतकºयांना कर्जमाफी मिळणे अशक्य झाले आहे. अर्ज दाखल न केलेल्या शेतकºयांनी अद्यापही मुदतवाढीची कोणतीही मागणी शासन अथवा प्रशासनाकडे केली नसल्याचा दावा यंत्रणेने केला.दुसरीकडे बँकांकडून कर्जमाफी अर्जासंदर्भात ६६ कलमांमध्ये आॅनलाईन अहवाल मागविण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक बँकांच्या शाखांकडे संगणक नाही. त्यामुळे कच्ची यादी तयार करून ही माहिती संगणकावर फिड करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत आॅडीट संपवण्याच्या सूचना शासनस्तरावरून होत्या. प्रत्यक्षात बँक स्तरावरील काम खोळंबले आहे. त्यासाठी आणखी आठ दिवस लागणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.शेतकºयांचे अर्ज आणि बँकांची यादी जुळल्यानंतर यादीचे चावडी वाचन होईल. यात गावपातळीवरून काही अडचणी आल्यास त्या सोडविल्या जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.३३ आॅडीटरवर साडेतीन लाख खात्यांचा भारजिल्ह्यात केवळ ३३ शासकीय आॅडीटर (लेखा परीक्षक) आहे. या तोकड्या लेखा परीक्षकांवर तीन लाख ६७ हजार शेतकºयांचे खात्यांचे आॅॅडीट करण्याचा भार पडला आहे. त्यामुळे मुदतीत त्यांनाही सर्व खात्यांची तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यांनाही आणखी आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. लेखा परीक्षकांची संख्या तोकडी असल्याने पुढील आठ दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल किंवा नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. या सर्व बाबींमुळे दिवाळीपूर्वी माफीची रक्कम खात्यात जमा होणे दुरापास्त झाले आहे.सभासद अंधारातचकर्जमाफीसाठी केवळ थकबाकीदार शेतकरी पात्र आहेत, असा गैरसमज गावपातळीवर आहे. मात्र नियमित खातेधारकालाही आॅनलाईन अर्ज भरायचे होते, याची माहिती त्यांना नव्हती. यामुळे हजारो नियमित खातेधारकांचे अर्ज सबमिटच झाले नाही.राज्यातील ५६ लाख खातेधारकांनी आॅनलाईन नोंद केली. बँक स्तरावरचे कामकाज आटोपल्यानंतर सोशल आॅडीट होईल. नंतर कर्जमाफीची पुढील प्रक्रिया होईल. सध्या मुदतवाढीसाठी सूचना नाही.- विजय झाडेसहकार आयुक्त, पुुणे