शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

निवृत्तांच्या उपदानातून कर्ज वसुली नाही

By admin | Updated: November 5, 2016 00:21 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपदानातून आता कर्जाची वसुली बंद झाली.

जिल्हा परिषद : पतसंस्थांपुढे आव्हान, सेवानिवृत्तांना दिलासायवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपदानातून आता कर्जाची वसुली बंद झाली. यामुळे निवृत्तांना दिलासा मिळाला असला, तरी कर्मचारी पतसंस्थांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेत विविध पदांवर जवळपास १४ हजारांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध शासकीय लाभ मिळतात. तसेच बँक आणि कर्मचारी पतसंस्थांकडून विविध कामांसाठी कर्ज प्राप्त होते. बहुतांश संवर्गातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारदार पतसंस्था स्थापन केल्या आहेत. जवळपास प्रत्येक कर्मचारी कोणत्या तरी पतसंसथेचे सभासद आहेत. यात शिक्षकांच्या पतसंस्था आघाडीवर आहेत. या पतसंस्था पगारदारांच्या असल्याने त्यांची कर्ज वसुली १00 टक्के असते. कर्ज वसुलीची हमी असल्याने या पतसंस्थांना सुगीचे दिवस आले आहे. बहुतांश कर्मचारी आपल्या पतसंस्थांकडून गृह कर्ज, शिक्षण कर्ज आदींची उचल करतात. जिल्हा परिषद संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पतसंस्थेच्या कर्जाची कपात करतात. यामुळे सर्वच पतसंस्थांची वसुली १00 टक्के असते. त्यामुळे या पतसंस्था रग्गड बनल्या. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या उपदानातून पतसंस्थांची कर्ज वसुली होत असल्याने पतसंस्थांना वसुलीची चिंताच नव्हती. त्यामुळे पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था चांगल्याच फोफावल्या.सेवानिवृत्त होताना कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम दिली जाते. या उपदानातून आता कर्ज वसुली करू नये, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहे. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून उपदानातून पतसंस्थेची कर्ज वसुली बंद झाली. यामुळे कर्मचारी पतसंस्थांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. सभासद निवृत्त होण्यापूर्वीच त्यांच्याकडून कर्ज वसुली करण्यासाठी पतसंस्थांची धडपड सुरू आहे. यातून मार्ग काढताना त्यांची चांगलीच कसरत होत आहे. (शहर प्रतिनिधी)