शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महागाव तालुक्यात कर्ज वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:43 IST

खरीप हंगामाकरिता तालुक्यातील २४ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी ३ हजार ७४२ शेतकरी सभासदांना २२ कोटी ७८ लाखांचे पीक कर्जवाटप ...

खरीप हंगामाकरिता तालुक्यातील २४ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी ३ हजार ७४२ शेतकरी सभासदांना २२ कोटी ७८ लाखांचे पीक कर्जवाटप केले आहे. कोरोनाकाळात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी चकरा मारू न देता वेळेत कर्जवाटप करून दिलासा देण्यात आला. त्यामुळे शेतकरी बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यास मोकळे झाले आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाले असले तरी यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना वेळेत व कुठलाही अनाठायी वेळ आणि खर्च न लागू देता कर्जाचे वाटप केले. मात्र, पोहंडुळ, हिवरा, मोरथ, चिलगव्हाण या चार सोसायट्या कर्जवाटपात माघारल्या आहेत. या सोसायट्यांमार्फत लवकरच कर्ज वाटप केले जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी सुरेश भरवाडे यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत २५ शेतकरी सभासदांना २२ लाखांचे पीक कर्जवाटप केल्याचे एसबीआयचे व्यवस्थापक संदीप हुकरे यांनी सांगितले. काळी दौलत सर्कलमध्ये सर्वाधिक कर्ज वितरण करणाऱ्या युनियन बँकेनेसुद्धा कर्ज वितरण सुरू केले आहे.

बॉक्स

६८ हजार हेक्टर क्षेत्र

तालुक्यात ६८ हजार हेक्टर लागवडक्षेत्र आहे. सोयाबीन आणि कपाशीची बरोबरीने लागवड असते. यावेळी काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मान्सून वेळेवर येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना थेट मिळत असल्याने यंदा कपाशीची मोठी लागवड होण्याचे संकेत आहेत. सोयाबीनचीसुद्धा तेवढ्याच प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबीनवरील राेगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट आली. त्यामुळे यंदा सोयाबीन लागवडीसंदर्भात साशंकता आहे.