शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विषबाधेने पुन्हा तीन शेतकºयांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:52 IST

कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेने जिल्ह्यात आणखी तीन शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

ठळक मुद्देफवारणी : आमलोन, पिसगाव व सावरगावची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेने जिल्ह्यात आणखी तीन शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. वणी तालुक्यातील आमलोन, मारेगाव तालुक्यातील पिसगाव आणि कळंब तालुक्यातील सावरगाव येथे शेतकºयांचा विषबाधेने मृत्यू झाला.वणी तालुक्यातील आमलोन येथील शेतकरी दत्तात्रय गजानन टेकाम (३५) याने गत चार दिवस आपल्या शेतातील पिकांवर कीटकनाशकाची फवारणी केली. या दरम्यान त्याला विषबाधा झाल्याचे लक्षात आले. उपचारासाठी तत्काळ कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने कुटुंंबियांनी वणीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रविवारी सकाळी १० वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी घटना मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे घडली. शंकर नागोराव आगलावे (४६) यांनी आपल्या शेतात चार दिवसापूर्वी कीटकनाशकाची फवारणी केली. फवारणीनंतर त्यांना डोकेदुखीचा त्रास वाढला. रुग्णालयात उपचारासाठी गेला असता विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तत्काळ नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचाही रविवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.तिसरी घटना कळंंब तालुक्यातील सावरगाव येथे घडली. गजानन नामदेव फुलमाळी (५२) यांनीसुद्धा आपल्या शेतात कीटकनाशकांची फवारणी केली होती. चार दिवसापूर्वी विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून १८ शेतकºयांचा विषबाधेने मृत्यू झाला असून ६०० वर रुग्ण उपचार घेत मृत्यूशी झुंज देत आहे. प्रशासकीय यंत्रणा यामागील कारणांचा शोध घेत आहे. परंतु उपाययोजना सापडत नाही.