शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेमुळे शेतकºयांचा मृत्यू हे सामूहिक हत्याकांडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:06 IST

जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन आतापर्यंत १९ शेतकºयांचा मृत्यू झाला आहे, हे शासन आणि कृषी विभागाने घडवून आणलेले हत्याकांडच आहे, .....

ठळक मुद्देरविकांत तुपकर : पालकमंत्र्यांकडून कृषी केंद्रांना वाचविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन आतापर्यंत १९ शेतकºयांचा मृत्यू झाला आहे, हे शासन आणि कृषी विभागाने घडवून आणलेले हत्याकांडच आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र आता दोषी कृषी केंद्र संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्यानेच आतापर्यंत एकाही कृषी केंद्र चालकावर कारवाई झाली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रपरिषदेत केला.विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबियांना भेटून आल्यानंतर ते पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या मृत्यूला शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचे म्हटले. यामागे भले मोठे रॅकेट असून मोठमोठ्या कंपन्या, डिलर, कृषी केंद्र संचालक, कृषी अधिकारी आणि कृषी मंत्री या सर्वांचा समावेश असल्याचे सांगून या सर्वांचा म्होरक्या नांदेड येथे आहे. तेथूनच सर्व सूत्रे हलविले जात असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. कृषीमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजिनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.जिल्ह्याचे पालकमंत्री हे दादागिरीची भाषा करीत असून शासनाने अदृश्य आणीबाणी लादली आहे, सत्तेच्या उन्मादामुळे शेतकरी-शेतमजूरांना यांनी वाºयावर सोडले असून नोटाबंदीत सर्वाधिक पैसे भाजपाच्या लोकांनी कमविल्याचा आरोपही त्यांनी केला. विषबाधेमुळे मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबियांना किमान पाच लाख रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकन कंपनीने रिजेक्ट केलेली फवारणीची औषधी या जिल्ह्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा संशय तुपकर यांनी व्यक्त केला. शेतकºयांना न्याय न मिळाल्यास भविष्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही रविकांत तुपकर म्हणाले.पत्रपरिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, देवानंद पवार, संतोष अरसोड आदींची उपस्थिती होती.