शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

विषबाधेमुळे शेतकºयांचा मृत्यू हे सामूहिक हत्याकांडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:06 IST

जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन आतापर्यंत १९ शेतकºयांचा मृत्यू झाला आहे, हे शासन आणि कृषी विभागाने घडवून आणलेले हत्याकांडच आहे, .....

ठळक मुद्देरविकांत तुपकर : पालकमंत्र्यांकडून कृषी केंद्रांना वाचविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन आतापर्यंत १९ शेतकºयांचा मृत्यू झाला आहे, हे शासन आणि कृषी विभागाने घडवून आणलेले हत्याकांडच आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र आता दोषी कृषी केंद्र संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्यानेच आतापर्यंत एकाही कृषी केंद्र चालकावर कारवाई झाली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रपरिषदेत केला.विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबियांना भेटून आल्यानंतर ते पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या मृत्यूला शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचे म्हटले. यामागे भले मोठे रॅकेट असून मोठमोठ्या कंपन्या, डिलर, कृषी केंद्र संचालक, कृषी अधिकारी आणि कृषी मंत्री या सर्वांचा समावेश असल्याचे सांगून या सर्वांचा म्होरक्या नांदेड येथे आहे. तेथूनच सर्व सूत्रे हलविले जात असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. कृषीमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजिनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.जिल्ह्याचे पालकमंत्री हे दादागिरीची भाषा करीत असून शासनाने अदृश्य आणीबाणी लादली आहे, सत्तेच्या उन्मादामुळे शेतकरी-शेतमजूरांना यांनी वाºयावर सोडले असून नोटाबंदीत सर्वाधिक पैसे भाजपाच्या लोकांनी कमविल्याचा आरोपही त्यांनी केला. विषबाधेमुळे मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबियांना किमान पाच लाख रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकन कंपनीने रिजेक्ट केलेली फवारणीची औषधी या जिल्ह्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा संशय तुपकर यांनी व्यक्त केला. शेतकºयांना न्याय न मिळाल्यास भविष्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही रविकांत तुपकर म्हणाले.पत्रपरिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, देवानंद पवार, संतोष अरसोड आदींची उपस्थिती होती.