शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

ओलित करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:04 IST

शेतात ओलित करताना विजेचा जबर धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कवठा बु. येथे रविवारी घडली.

ठळक मुद्देकवठाची घटना : लोंबकळणाऱ्या तारांनी घात

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शेतात ओलित करताना विजेचा जबर धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कवठा बु. येथे रविवारी घडली. लोंबकळणाऱ्या वीज तारांनी शेतकऱ्याचा घात केला. शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला.राजू रामकृष्ण जुनघरे (४०) रा. कवठा बु. असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात रविवारी ओलित करीत होते. ओलित करताना लोखंडी पाईप उचलताना तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. काही वेळातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला वीज वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत संबंधित अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई-वडील असा आप्त परिवार आहे.दरम्यान वीज वितरण कंपनीचे अभियंता सौरभ नैताम यांनी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात विलास वामनराव जुनघरे यांनी माझा पुतण्या तुमच्या हलगर्जीपणामुळे मरण पावला, असे म्हणत धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. त्यावरून पारवा पोलिसांनी विलास जुनघरेविरुद्ध गुन्हा केला आहे. या घटनेने वीज वितरणविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.