शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १५ पोलिसांचा कर्तव्यावर मृत्यू

By admin | Updated: January 13, 2015 23:06 IST

अपुरे संख्याबळ, न मिळणाऱ्या सुट्या, कामाचा वाढता भार आणि कौटुंबिक जबाबदारी आदी कारणांनी मानसीक तणावात आलेल्या तब्बल १५ पोलिसांचा वर्षभरात कर्तव्यावरच मृत्यु झाला.

सतीश येटरे - यवतमाळअपुरे संख्याबळ, न मिळणाऱ्या सुट्या, कामाचा वाढता भार आणि कौटुंबिक जबाबदारी आदी कारणांनी मानसीक तणावात आलेल्या तब्बल १५ पोलिसांचा वर्षभरात कर्तव्यावरच मृत्यु झाला. सोमवारी रात्री वाहतूक शिपायाचा कर्तव्यावर झालेल्या मृत्युने मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तणावमुक्तीसाठी कुठल्याही उपाययोजना पोलीस खात्यात होताना दिसत नाही. परिणामी मानसिक तणावाची समस्या गंभीर होत आहे. वरिष्ठस्तराहून येणारे हायअलर्ट, राजकीय नेते आणि व्हीआयपींचे दौरे, निवडणुका, दंगलीच्या घटनांमुळे पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवावा लागतो. कोणताही सण असला तरी हातात दांडा घेवून कर्तव्य बजावावे लागे. कामाचा ताण कमी व्हावा आणि कुटुंबात वेळ घालविता यावा म्हणून गृह खात्याने पोलिसांना साप्ताहिक सुटी व वार्षिक सुट्या मंजूर केल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वार्षिक तर सोडा साप्ताहिक सुटीही मिळत नाही. अचानक घडणाऱ्या गंभीर घटना माहिती होताच समोरचे ताटही सोडून धाव घ्यावी लागते. एकेकाकडे डझनावर तपास, रात्रंदिवस गस्त असते. वरिष्ठांचा त्रास आणि कामे करताना झालेल्या चुकातून चौकाशीचा ससेमीरा, निलंबन, याबाबी पोलिसांच्या तणावात भर घालतात. या व्यवस्तेत कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे शल्य चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते. त्यातूनच जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी कायम तणावात दिसतात. मात्र त्यांना तणावातून मुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. . गेल्या वर्षभरात एक दोन नव्हे तर तब्बल १५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर मृत्यू झाला. सोमवारी रात्री प्रभाकर सिंगनजुडे या वाहतूक पोलीसाचा हृद्यविकाराने मृत्यू झाला. मंगळवारी वाघापूर मोक्षधामात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी त्यांच्या पार्थीवाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर बंदुकीतून फैरी झाडून पोलिसांनी मानवंदना दिली. असे असले तरी कर्तव्य बजावताना मृत्यूची ही घटना पोलिसांच्या तणावाचे आणि त्यांच्या ढासळत्या आरोग्याचे वास्तवच मांडणारी ठरली आहे.