शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

वर्षभरात १५ पोलिसांचा कर्तव्यावर मृत्यू

By admin | Updated: January 13, 2015 23:06 IST

अपुरे संख्याबळ, न मिळणाऱ्या सुट्या, कामाचा वाढता भार आणि कौटुंबिक जबाबदारी आदी कारणांनी मानसीक तणावात आलेल्या तब्बल १५ पोलिसांचा वर्षभरात कर्तव्यावरच मृत्यु झाला.

सतीश येटरे - यवतमाळअपुरे संख्याबळ, न मिळणाऱ्या सुट्या, कामाचा वाढता भार आणि कौटुंबिक जबाबदारी आदी कारणांनी मानसीक तणावात आलेल्या तब्बल १५ पोलिसांचा वर्षभरात कर्तव्यावरच मृत्यु झाला. सोमवारी रात्री वाहतूक शिपायाचा कर्तव्यावर झालेल्या मृत्युने मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तणावमुक्तीसाठी कुठल्याही उपाययोजना पोलीस खात्यात होताना दिसत नाही. परिणामी मानसिक तणावाची समस्या गंभीर होत आहे. वरिष्ठस्तराहून येणारे हायअलर्ट, राजकीय नेते आणि व्हीआयपींचे दौरे, निवडणुका, दंगलीच्या घटनांमुळे पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवावा लागतो. कोणताही सण असला तरी हातात दांडा घेवून कर्तव्य बजावावे लागे. कामाचा ताण कमी व्हावा आणि कुटुंबात वेळ घालविता यावा म्हणून गृह खात्याने पोलिसांना साप्ताहिक सुटी व वार्षिक सुट्या मंजूर केल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वार्षिक तर सोडा साप्ताहिक सुटीही मिळत नाही. अचानक घडणाऱ्या गंभीर घटना माहिती होताच समोरचे ताटही सोडून धाव घ्यावी लागते. एकेकाकडे डझनावर तपास, रात्रंदिवस गस्त असते. वरिष्ठांचा त्रास आणि कामे करताना झालेल्या चुकातून चौकाशीचा ससेमीरा, निलंबन, याबाबी पोलिसांच्या तणावात भर घालतात. या व्यवस्तेत कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे शल्य चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते. त्यातूनच जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी कायम तणावात दिसतात. मात्र त्यांना तणावातून मुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. . गेल्या वर्षभरात एक दोन नव्हे तर तब्बल १५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर मृत्यू झाला. सोमवारी रात्री प्रभाकर सिंगनजुडे या वाहतूक पोलीसाचा हृद्यविकाराने मृत्यू झाला. मंगळवारी वाघापूर मोक्षधामात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी त्यांच्या पार्थीवाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर बंदुकीतून फैरी झाडून पोलिसांनी मानवंदना दिली. असे असले तरी कर्तव्य बजावताना मृत्यूची ही घटना पोलिसांच्या तणावाचे आणि त्यांच्या ढासळत्या आरोग्याचे वास्तवच मांडणारी ठरली आहे.