शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बंदी भागात मरणयातना

By admin | Updated: July 16, 2014 00:29 IST

पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही

रस्ते नादुरुस्त : पावसाळ्यात तुटतो गावांचा संपर्कअविनाश खंदारे ल्ल उमरखेड (कुपटी)पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पूलही खिळखिळे झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. सार्वजनिक बांधकाम विभाग अभयारण्याच्या नियमांचे कारण पुढे करून दुरुस्तीत टाळाटाळ करीत आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीतिरावर पैनगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात ६० किलोमीटर चौरस परिसरात पसरलेल्या भागाला बंदी भाग म्हणून ओळखले जाते. जवराळा, थेरडी, डोंगरगाव, सोनदाभी, गाडी, बोरी, खरबीसह अनेक गावे आहे. या गावांना जोडण्यासाठी कधीकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते केले होते. मात्र दुरुस्तीचे नावच कुणी घेत नाही. २० वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग अभयारण्याच्या जाचक कायद्याचे कारण पुढे करते. उमरखेड ते किनवट जाणारा रस्ता जेवलीपासून किनवटपर्यंत पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावर दुरुस्ती केली जात नाही. आणि नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव तयार होत नाही. हा रस्ता पैनगंगा अभयारण्यातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून किनवट अथवा उमरखेड आणि पुढे जावे लागते. रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागतात. गेल्या २० वर्षांपासून नागरिक रस्त्यासाठी लढा देत आहे. जेवली ते किनवट या रस्त्यावर जनावरांनाही चालता येत नाही. वाहन कसे जात असेल, हे त्या चालकांनाच माहीत. या मार्गावरील पूल जीर्ण होऊन खचले आहेत. काही पूल गाळ अडकल्याने जमिनीबरोबर आले आहेत. अशा स्थितीतही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. पावसाळ्यात नाल्याला पूर आला तरी तासनतास वाहतूक ठप्प होते. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जातात. त्यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो.