शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

२४ वर्षांपूर्वीची ‘डीई’ तहसीलदाराच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 07:00 IST

Yawatmal news एका तहसीलदाराची २४ वर्षांपूर्वी खातेनिहाय चौकशी (डीई) सुरू झाली आणि त्याच्या मृत्यूच्या तब्बल सात वर्षानंतर संपली. महसूलच्या या अजब कारभाराची यवतमाळपासून मुंबईपर्यंत सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

ठळक मुद्देमहसूल खात्याचा अजब कारभार अवघ्या ५१ हजाराचा हिशेब न लागल्याचे प्रकरण

 राजेश निस्तानेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपजिल्हाधिकाऱ्यांना १८-१९ वर्षाच्या सेवेनंतरही पहिली पदोन्नती न मिळणे, आयएएस अवॉर्डेड अधिकाऱ्यांना दीड ते दोन महिने नियुक्तीच न मिळणे हे महसूल खात्याचे कारभार गाजत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तहसीलदाराची २४ वर्षांपूर्वी खातेनिहाय चौकशी (डीई) सुरू झाली आणि त्याच्या मृत्यूच्या तब्बल सात वर्षानंतर संपली. महसूलच्या या अजब कारभाराची यवतमाळपासून मुंबईपर्यंत सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

पृथ्वीराज व्ही. चव्हाण असे या तहसीलदाराचे नाव आहे. नंदूरबार जिल्ह्याच्या अक्रानी येथे ते कार्यरत होते. नवसंजीवन योजनेअंतर्गत मंजूर दीड लाख रुपयांच्या अनुदानापैकी ५१ हजारांच्या रकमेचा हिशेब सादर केला नाही, या कारणावरून त्यांची २८ जून १९९६ ला विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. सुमारे चार वर्षे ही चौकशी चालली. १६ डिसेंबर २००० ला या चौकशीचा अहवाल सादर केला गेला. त्यात चव्हाण यांच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध होत असल्याचा अभिप्राय नोंदविला गेला. हिबेश जुळत नसलेली ५१ हजारांची रक्कम चव्हाण यांच्या निवृत्तीवेतनातून दरमहा ५ टक्के या प्रमाणे कपात करण्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली. 

मंत्रालयातील आगीचा आडोसा दरम्यान मंत्रालयात आग लागली आणि ही चौकशीच थांबली. पुढे त्याची कागदपत्रे मिळाली नाही, उपलब्ध कागदपत्रावरून त्या प्रकरणात पुढे काय कारवाई झाली, याचा बोध होत नसल्याचे नमूद केले गेले. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचे १३ ऑक्टोबर २०१३ ला निधन झाले. त्यानंतरही गेली सात वर्षे हे प्रकरण पडून होते. अखेर सात वर्षानंतर खातेनिहाय चौकशीची ही फाईल बंद करण्यात आली. नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखेने २० ऑक्टोबर २०२० रोजी त्यासंबधीची नोंद घेतली. 

शासकीय यंत्रणेचा विश्वासच बसेनाएखाद्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी तब्बल २४ वर्षे चालू शकते आणि त्याच्या मृत्यूनंतर ती बंद करायला महसूल खात्याला तब्बल सात वर्षे लागतात यावर शासकीय यंत्रणेत कुणाचाच विश्वास बसेनासा झाला आहे.  परंतु हे वास्तव आहे. या प्रकाराने महसूल खात्याचा राज्यातील एकूणच कारभार कसा चालतो हे देखील अधोरेखीत झाले आहे.  

‘आयएएस’ अधिकारी दोन महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेतमहसूल खात्याच्या अशा कारभाराची इतरही काही प्रकरणे चर्चेत आहेत. राज्यातील २३ अपर  जिल्हाधिकाऱ्यांना २ सप्टेंबर २०२० रोजी आयएएस कॅडरमध्ये समाविष्ठ केले गेले. त्यावरून सुमारे दोन महिने लोटत आहेत. मात्र अद्याप यातील सात अधिकाऱ्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत. काहींना मात्र यादीतील क्रमानुसार नव्हे तर सोईने क्रमखालीवर करून नियुक्त्या  दिल्या गेल्या.  ते पाहता या नियुक्त्यांसाठी प्रतीक्षा का, ‘भेटी-गाठी’ संस्कृतीतून तर या नियुक्त्या होत नाही ना , अशी शंका व्यक्त केली जात आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बढत्यांचेही वर्षानुवर्षे असेच भिजत घोंगडे ठेवण्यात आले आहे.  

टॅग्स :Governmentसरकार