शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

साईटवरून दारव्हा झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:38 IST

कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमुक्ती : उरले दोन दिवस, कसे होईल अर्ज आॅनलाईन, रोष वाढला

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.विशेष म्हणजे हे अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता दोनच दिवस उरले असून, एवढ्या कमी वेळात हजारो शेतकºयांचे अर्ज कसे आॅनलाईन भरले जाणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घ्यायचा झाल्यास पात्र शेतकºयांना सेतू केंद्र, इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आॅनलाईन अर्ज करावे लागतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ठराविक नमुन्यात प्रत्येकाची माहिती भरावी लागते. प्राथमिक माहिती भरल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीचे नाव, गावाचे नाव असा पर्याय येतो. परंतु, दारव्ह्याच्या शेतकºयांना दारव्हा नगरपालिका असल्याने ग्रामपंचायतीच्या रकान्यात गावाचे नाव टाकता येत नाही आणि टाकल्यास अर्ज स्वीकारल्या जात नाही. दारव्हा या गावाचे नावच साईटवर नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. याबाबत काही शेतकºयांची तहसीलदारांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर टाकली. त्याचप्रमाणे सेतू केंद्र व इंटरनेट कॅफेवाल्यांनीसुद्धा त्यांना निवेदन सादर केले असून, त्यामध्ये दारव्हा खंड १ व खंड २ चे नाव सदर वेबसाईटमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे आम्ही केवळ शेतकºयांचे रजिस्ट्रेशन करून ठेवत आहो. पुढे काही समस्या उद्भवल्यास पूर्ण अर्ज कमी कालावधीत भरता येणार नाही, असे स्पष्ट कळविण्यात आले आहे.तहसीलदारांनी साईट अपडेट होईल, असे शेतकºयांना सांगितले होते. परंतु अद्यापही दारव्हा शहराचे नाव समाविष्ट न झाल्याने शेतकरी अडचणीत सपडले आहे.दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनगेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे कर्जमुक्तीच्या अर्जाचे कामकाज ठप्प पडले आहे. सेतू केंद्र इंटरनेटवर शेतकºयांच्या रांगा लागल्या आहे. शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दारव्हा तालुक्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.