शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

साईटवरून दारव्हा झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:38 IST

कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमुक्ती : उरले दोन दिवस, कसे होईल अर्ज आॅनलाईन, रोष वाढला

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.विशेष म्हणजे हे अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता दोनच दिवस उरले असून, एवढ्या कमी वेळात हजारो शेतकºयांचे अर्ज कसे आॅनलाईन भरले जाणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घ्यायचा झाल्यास पात्र शेतकºयांना सेतू केंद्र, इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आॅनलाईन अर्ज करावे लागतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ठराविक नमुन्यात प्रत्येकाची माहिती भरावी लागते. प्राथमिक माहिती भरल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीचे नाव, गावाचे नाव असा पर्याय येतो. परंतु, दारव्ह्याच्या शेतकºयांना दारव्हा नगरपालिका असल्याने ग्रामपंचायतीच्या रकान्यात गावाचे नाव टाकता येत नाही आणि टाकल्यास अर्ज स्वीकारल्या जात नाही. दारव्हा या गावाचे नावच साईटवर नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. याबाबत काही शेतकºयांची तहसीलदारांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर टाकली. त्याचप्रमाणे सेतू केंद्र व इंटरनेट कॅफेवाल्यांनीसुद्धा त्यांना निवेदन सादर केले असून, त्यामध्ये दारव्हा खंड १ व खंड २ चे नाव सदर वेबसाईटमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे आम्ही केवळ शेतकºयांचे रजिस्ट्रेशन करून ठेवत आहो. पुढे काही समस्या उद्भवल्यास पूर्ण अर्ज कमी कालावधीत भरता येणार नाही, असे स्पष्ट कळविण्यात आले आहे.तहसीलदारांनी साईट अपडेट होईल, असे शेतकºयांना सांगितले होते. परंतु अद्यापही दारव्हा शहराचे नाव समाविष्ट न झाल्याने शेतकरी अडचणीत सपडले आहे.दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनगेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे कर्जमुक्तीच्या अर्जाचे कामकाज ठप्प पडले आहे. सेतू केंद्र इंटरनेटवर शेतकºयांच्या रांगा लागल्या आहे. शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दारव्हा तालुक्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.