शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतरही अपत्य

By admin | Updated: June 3, 2016 02:40 IST

छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली.

मदतीसाठी प्रशासनाकडे धाव : दोन मुलानंतर शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला दोन मुलीयवतमाळ : छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मात्र या शस्त्रक्रियेनंतरही तिला तीन मुली झाल्या. यानंतर अखेर पतीने शस्त्रक्रिया करून घेतली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतरही आपल्याला अपत्य झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी आता ही महिला करीत आहे. यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा येथील सोनीबाई (नाव बदललेले) या महिलेची ही कहाणी आहे. तिचे लग्न झाल्यानंतर एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य झाले. सुखी संसारासाठी दोन मुलावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १९९५ मध्ये त्यांनी आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित अकोलाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेतली. मात्र काही दिवसातच ही शस्त्रक्रिया फेल झाल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेनंतरही तिला मुलगी झाली. दरम्यान या प्रकाराची तक्रार सदर महिलेने पतीसह आरोग्य विभागाकडे केली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात पुन्हा तिला मुलगी झाली. या प्रकाराने धास्तावलेल्या या कुटुंबाने आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदविली. तसेच तिच्या पतीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतली. आता या मुलांच्या पालन पोषणाचा भार या गरीब कुटुंबावर येत आहे. दोन मुलांवरच शस्त्रक्रिया केल्यानंतरही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणखी दोन मुलांचे पालन पोषण करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाची तक्रार तिच्या पतीने जिल्हा परिषदेकडे केली. या प्रकरणात आरोग्य विभागाने चूक मान्य करीत सदर महिलेला नुकसानभरपाई पोटी ३० हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य समितीपुढे ठेवण्यात आला. यंत्रणेतील दोष मान्य करून ३० हजार नुकसानभरपाईच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे एकाच महिला डॉक्टरने अकोला बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९५ आणि त्यानंतर १९९७ मध्ये सदर महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली होती. दोनही वेळेस शस्त्रक्रिया फेल झाल्याने शेवटी पतीनेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली. आता तीन एकर कोरडवाहू शेती असताना लग्नाला आलेल्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न या दाम्पत्याला सतावत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)