शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतरही अपत्य

By admin | Updated: June 3, 2016 02:40 IST

छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली.

मदतीसाठी प्रशासनाकडे धाव : दोन मुलानंतर शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला दोन मुलीयवतमाळ : छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मात्र या शस्त्रक्रियेनंतरही तिला तीन मुली झाल्या. यानंतर अखेर पतीने शस्त्रक्रिया करून घेतली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतरही आपल्याला अपत्य झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी आता ही महिला करीत आहे. यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा येथील सोनीबाई (नाव बदललेले) या महिलेची ही कहाणी आहे. तिचे लग्न झाल्यानंतर एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य झाले. सुखी संसारासाठी दोन मुलावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १९९५ मध्ये त्यांनी आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित अकोलाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेतली. मात्र काही दिवसातच ही शस्त्रक्रिया फेल झाल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेनंतरही तिला मुलगी झाली. दरम्यान या प्रकाराची तक्रार सदर महिलेने पतीसह आरोग्य विभागाकडे केली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात पुन्हा तिला मुलगी झाली. या प्रकाराने धास्तावलेल्या या कुटुंबाने आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदविली. तसेच तिच्या पतीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतली. आता या मुलांच्या पालन पोषणाचा भार या गरीब कुटुंबावर येत आहे. दोन मुलांवरच शस्त्रक्रिया केल्यानंतरही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणखी दोन मुलांचे पालन पोषण करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाची तक्रार तिच्या पतीने जिल्हा परिषदेकडे केली. या प्रकरणात आरोग्य विभागाने चूक मान्य करीत सदर महिलेला नुकसानभरपाई पोटी ३० हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य समितीपुढे ठेवण्यात आला. यंत्रणेतील दोष मान्य करून ३० हजार नुकसानभरपाईच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे एकाच महिला डॉक्टरने अकोला बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९५ आणि त्यानंतर १९९७ मध्ये सदर महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली होती. दोनही वेळेस शस्त्रक्रिया फेल झाल्याने शेवटी पतीनेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली. आता तीन एकर कोरडवाहू शेती असताना लग्नाला आलेल्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न या दाम्पत्याला सतावत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)