शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतरही अपत्य

By admin | Updated: June 3, 2016 02:40 IST

छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली.

मदतीसाठी प्रशासनाकडे धाव : दोन मुलानंतर शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला दोन मुलीयवतमाळ : छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मात्र या शस्त्रक्रियेनंतरही तिला तीन मुली झाल्या. यानंतर अखेर पतीने शस्त्रक्रिया करून घेतली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतरही आपल्याला अपत्य झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी आता ही महिला करीत आहे. यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा येथील सोनीबाई (नाव बदललेले) या महिलेची ही कहाणी आहे. तिचे लग्न झाल्यानंतर एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य झाले. सुखी संसारासाठी दोन मुलावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १९९५ मध्ये त्यांनी आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित अकोलाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेतली. मात्र काही दिवसातच ही शस्त्रक्रिया फेल झाल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेनंतरही तिला मुलगी झाली. दरम्यान या प्रकाराची तक्रार सदर महिलेने पतीसह आरोग्य विभागाकडे केली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात पुन्हा तिला मुलगी झाली. या प्रकाराने धास्तावलेल्या या कुटुंबाने आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदविली. तसेच तिच्या पतीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतली. आता या मुलांच्या पालन पोषणाचा भार या गरीब कुटुंबावर येत आहे. दोन मुलांवरच शस्त्रक्रिया केल्यानंतरही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणखी दोन मुलांचे पालन पोषण करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाची तक्रार तिच्या पतीने जिल्हा परिषदेकडे केली. या प्रकरणात आरोग्य विभागाने चूक मान्य करीत सदर महिलेला नुकसानभरपाई पोटी ३० हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य समितीपुढे ठेवण्यात आला. यंत्रणेतील दोष मान्य करून ३० हजार नुकसानभरपाईच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे एकाच महिला डॉक्टरने अकोला बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९५ आणि त्यानंतर १९९७ मध्ये सदर महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली होती. दोनही वेळेस शस्त्रक्रिया फेल झाल्याने शेवटी पतीनेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली. आता तीन एकर कोरडवाहू शेती असताना लग्नाला आलेल्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न या दाम्पत्याला सतावत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)