शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मोठे वडगावात थाटले पालिकेने डम्पिंग ग्राऊंड

By admin | Updated: February 25, 2017 01:00 IST

शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत

दुर्गंधी : वाघाडी नदीच्या पाण्याचेही प्रदूषण यवतमाळ : शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून मात्र मोठे वडगाव परिसरात घाण पसरविण्याचे काम सुरू आहे. शहरातून गोळा केलेला घनकचरा जसाच्या तसाच वडगाव बायपास परिसरात टाकण्यात येत आहे. येथे अनधिकृत डंम्पींग यार्डच पालिकेने तयार केले आहे. नगपरिषद विस्तारानंतर सर्वप्रथम शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासन लक्ष देईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी सफाई कंत्राटदाराकडून जागा मिळेल तिथे कचरा टाकण्यात येत आहे. पूर्वी धामणगाव बायपासवर याच पद्धतीने कचरा टाकला जात होता. आताही येथे कमीअधिक प्रमाणात कचरा टाकला जातो. अर्ध्या शहराचा कचरा, वडगाव बायापासवरील वाघाडी नदीत जाणाऱ्या नाल्यात टाकण्यात येत आहे. यामुळे वाघाडी नदीचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील घाण जमा करून वडगाव परिसरातून जाणाऱ्या जांब बायपासवरील नाल्यात टाकली जात आहे. याबाबत तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही. याच मुद्दावर पालिकेतील पहिल्याच सर्वसाधारण सभेत वडगाव परिसरातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर या भागात अनधिकृतपणे कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्याचे ढिगारे पेटवून दिले जातात. यातून प्रचंड धूर निर्माण होतो. त्याचा त्रास लगतच्या वसाहतीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट जळालेला कचरा कुजल्यानंतर त्यातून निघणारे घाण पाणी थेट नाल्यातून वाघाडी नदीत जात असल्याने या नदी तीरावरील गावांतील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत आता नागरिकांमधून उघड संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)