शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोठे वडगावात थाटले पालिकेने डम्पिंग ग्राऊंड

By admin | Updated: February 25, 2017 01:00 IST

शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत

दुर्गंधी : वाघाडी नदीच्या पाण्याचेही प्रदूषण यवतमाळ : शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो योग्य पद्धतीने नष्ट करावा, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून मात्र मोठे वडगाव परिसरात घाण पसरविण्याचे काम सुरू आहे. शहरातून गोळा केलेला घनकचरा जसाच्या तसाच वडगाव बायपास परिसरात टाकण्यात येत आहे. येथे अनधिकृत डंम्पींग यार्डच पालिकेने तयार केले आहे. नगपरिषद विस्तारानंतर सर्वप्रथम शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासन लक्ष देईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी सफाई कंत्राटदाराकडून जागा मिळेल तिथे कचरा टाकण्यात येत आहे. पूर्वी धामणगाव बायपासवर याच पद्धतीने कचरा टाकला जात होता. आताही येथे कमीअधिक प्रमाणात कचरा टाकला जातो. अर्ध्या शहराचा कचरा, वडगाव बायापासवरील वाघाडी नदीत जाणाऱ्या नाल्यात टाकण्यात येत आहे. यामुळे वाघाडी नदीचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील घाण जमा करून वडगाव परिसरातून जाणाऱ्या जांब बायपासवरील नाल्यात टाकली जात आहे. याबाबत तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही. याच मुद्दावर पालिकेतील पहिल्याच सर्वसाधारण सभेत वडगाव परिसरातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर या भागात अनधिकृतपणे कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्याचे ढिगारे पेटवून दिले जातात. यातून प्रचंड धूर निर्माण होतो. त्याचा त्रास लगतच्या वसाहतीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट जळालेला कचरा कुजल्यानंतर त्यातून निघणारे घाण पाणी थेट नाल्यातून वाघाडी नदीत जात असल्याने या नदी तीरावरील गावांतील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत आता नागरिकांमधून उघड संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)