शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दारव्हा ठाण्यात ८१ गावांचा भार केवळ ६० पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:30 IST

पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देतारेवरची कसरत : गुन्हे नियंत्रणासाठी महिला ठाणेदार आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या कमी मनुष्यबळातही दारव्ह्याच्या पहिल्या महिला ठाणेदार रिता उईके यांचे गुन्हेगारी नियंत्रण व सामाजिक शांततेसाठी परिश्रम सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.दारव्हा पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रण व एसपींच्या आदेशावरून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी नियमित कामकाज व तपास सांभाळून वेळ मिळेल तेव्हा मोहिमा राबविल्या जात आहे. त्यामुळे प्रॉपर्टी व शरीरासंबंधीचे गुन्हे बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहेत. घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न होत आहेत. त्यात त्यांना बºयापैकी यशही मिळते आहे.आगामी सण, उत्सवाचा काळ बघता ठाणेदार रिता उईके यांनी दारव्हा ठाण्यातील परंपरागत एकाधिकारशाही पद्धत बंद करून अधिकाºयांचे विकेंद्रीकरण केल्याने पोलीस यंत्रणेतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठ महिन्यात दारू, मटका, जुगार विरोधात कारवाई करून ३४६ गुन्हे नोंदविले गेले असून त्यात पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणेदार उईके यांनी आतापर्यंत विविध कलमान्वये ५०० वर व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व अन्य कायद्यान्वये कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाºया ६२ चालकांना पकडण्यात आले. मोटार वाहन कायद्यांतर्गत ७५० व्यक्तींवर कारवाई करून दीड लाखांचा दंड वसूल केला गेला. गेल्या आठ महिन्यात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी एकही घटना दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली नसल्याचे ठाणेदार रिता उईके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्व सण, उत्सव शांततेत पार पाडण्यात दारव्हा पोलिसांना यश आले आहे. या कामी आपल्याला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.