शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसमोर अंधार

By admin | Updated: October 18, 2014 23:01 IST

वर्षानुवर्षे कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्याचा विषय तर दूरच, अंगावरील कर्ज कसे फेडावे, याचीच काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे.

पुसद : वर्षानुवर्षे कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्याचा विषय तर दूरच, अंगावरील कर्ज कसे फेडावे, याचीच काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे.गेल्या दीड वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने शेती उत्पादनापासून वंचित राहावे लागत आहे. मागिल वर्षी आधी अतिवृष्टी आणि नंतर परतीचा पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. यावर्षी आधी पावसाने दडी मारली. त्यामुळे दुबार व तिबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली. पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्यामुळे पिकांना पाणी देता येऊ शकले नाही. त्यातच पावसाळ्याच्या शेवटी काही प्रमाणात चांगला पाऊस झाल्याने अनेकांच्या शेतातील पिके बहरली होती. परंतु आॅक्टोबर हिटमध्ये ही पिकेसुद्धा वाया गेली. अनेकांच्या सोयाबीन पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव झाला. पावसाने तर डोळेच वटारले. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे तेसुद्धा भारनियमनामुळे पिकांना पाणी देऊ शकले नाही. अद्यापही शेतातील कापूस घरी आला नाही तर सोयाबीनने पूर्णत: दगा दिला. त्यामुळे चार दिवसांवर आलेली दिवाळी कशी साजरी करावी, हा मोठा प्रश्न आहे. भारतीय सणांच्या परंपरेतील सर्वात मोठा व सर्वांच्या जीवनात प्रकाश आणणारा सण म्हणजे दिवाळी. गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वचजण आपापल्या परिने हा सण साजरा करतात. वर्षभराची खरेदी याच काळात केली जाते. लेकी, सुणा मोठ्या आनंद व उत्साहाने या सणाची वर्षभर वाट पाहतात. कारण त्यांना या काळात माहेरची आस लागलेली असते. परंतु ‘नेमोचि येतो पावसाळा’याप्रमाणे यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करावी, हा प्रश्न आहेच. तालुक्यात यंदा सुरूवातीपासूनच निसर्गाची अवकृपा दिसून आली. सोयाबीन, उडिद, मूग, ज्वारी आदी पिकांची कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागली. पावसाळ्याच्या सुरवातीची नक्षत्रे कोरडी गेल्याने पेरणी उशीरा झाली. मात्र तब्बल दोन महिने पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम शेती उत्पन्नावर झाला. उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ज्वारी, कापूस आदी पिकांचे उत्पन्नच दिसले नाही. सोयाबीन व कापसांसारख्या महत्वपूर्ण आणि नगदी पिकांनीसुद्धा दगा दिला. यंदा सोयाबीन पोत्यांनी नव्हे तर किलोनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सायोबीनसारखीच कापसाचीही अवस्था आहे. साधारणत: दिवाळीपूर्वी कापूस शेतकऱ्यांच्या घरी येतो. कापूस विकूनच शेतकरी दिवाळी दरवर्षी आनंदात साजरी करतात. परंतु यंदा कापसाचा उतारा नाही. त्यातही अपरिपक्क बोंडे फुटत आहे. शेतकऱ्यांच्या घरी कापूस आला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. याउलट अनेकांनी दिवाळीपूर्वीच निवडणुकीमुळे दिवाळी साजरी केली आहे. शेतकऱ्यांकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)