शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसमोर अंधार

By admin | Updated: October 18, 2014 23:01 IST

वर्षानुवर्षे कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्याचा विषय तर दूरच, अंगावरील कर्ज कसे फेडावे, याचीच काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे.

पुसद : वर्षानुवर्षे कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्याचा विषय तर दूरच, अंगावरील कर्ज कसे फेडावे, याचीच काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे.गेल्या दीड वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने शेती उत्पादनापासून वंचित राहावे लागत आहे. मागिल वर्षी आधी अतिवृष्टी आणि नंतर परतीचा पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. यावर्षी आधी पावसाने दडी मारली. त्यामुळे दुबार व तिबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली. पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्यामुळे पिकांना पाणी देता येऊ शकले नाही. त्यातच पावसाळ्याच्या शेवटी काही प्रमाणात चांगला पाऊस झाल्याने अनेकांच्या शेतातील पिके बहरली होती. परंतु आॅक्टोबर हिटमध्ये ही पिकेसुद्धा वाया गेली. अनेकांच्या सोयाबीन पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव झाला. पावसाने तर डोळेच वटारले. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे तेसुद्धा भारनियमनामुळे पिकांना पाणी देऊ शकले नाही. अद्यापही शेतातील कापूस घरी आला नाही तर सोयाबीनने पूर्णत: दगा दिला. त्यामुळे चार दिवसांवर आलेली दिवाळी कशी साजरी करावी, हा मोठा प्रश्न आहे. भारतीय सणांच्या परंपरेतील सर्वात मोठा व सर्वांच्या जीवनात प्रकाश आणणारा सण म्हणजे दिवाळी. गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वचजण आपापल्या परिने हा सण साजरा करतात. वर्षभराची खरेदी याच काळात केली जाते. लेकी, सुणा मोठ्या आनंद व उत्साहाने या सणाची वर्षभर वाट पाहतात. कारण त्यांना या काळात माहेरची आस लागलेली असते. परंतु ‘नेमोचि येतो पावसाळा’याप्रमाणे यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करावी, हा प्रश्न आहेच. तालुक्यात यंदा सुरूवातीपासूनच निसर्गाची अवकृपा दिसून आली. सोयाबीन, उडिद, मूग, ज्वारी आदी पिकांची कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागली. पावसाळ्याच्या सुरवातीची नक्षत्रे कोरडी गेल्याने पेरणी उशीरा झाली. मात्र तब्बल दोन महिने पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम शेती उत्पन्नावर झाला. उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ज्वारी, कापूस आदी पिकांचे उत्पन्नच दिसले नाही. सोयाबीन व कापसांसारख्या महत्वपूर्ण आणि नगदी पिकांनीसुद्धा दगा दिला. यंदा सोयाबीन पोत्यांनी नव्हे तर किलोनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सायोबीनसारखीच कापसाचीही अवस्था आहे. साधारणत: दिवाळीपूर्वी कापूस शेतकऱ्यांच्या घरी येतो. कापूस विकूनच शेतकरी दिवाळी दरवर्षी आनंदात साजरी करतात. परंतु यंदा कापसाचा उतारा नाही. त्यातही अपरिपक्क बोंडे फुटत आहे. शेतकऱ्यांच्या घरी कापूस आला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. याउलट अनेकांनी दिवाळीपूर्वीच निवडणुकीमुळे दिवाळी साजरी केली आहे. शेतकऱ्यांकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)