शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पंचायत विभागाची पंचाईत

By admin | Updated: August 30, 2014 02:08 IST

जिल्हा परिषदेचा संपूर्ण डोलारा हा पंचायत विभागावर उभा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या विभागालाच घरघर लागली आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेचा संपूर्ण डोलारा हा पंचायत विभागावर उभा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या विभागालाच घरघर लागली आहे. येथील कामाचा व्याप अधिक असल्याने अधिकारी व कर्मचारी तेथे काम करण्यास तयार नाही. प्रत्येक जण वेळ काढून सोयीच्या ठिकाणी जाण्याच्याच मानसिकतेत पंचायत विभागात येतो. यामुळे येथील कामकाज पूर्णत: ढेपाळले आहे. जिल्ह्यातील १ हजार २०७ ग्रामपंचायतींच्या विकासाचे नियोजन आणि प्रशासकीय कामकाजाचे देखरेख पंचायत विभागातून केली जाते. पंचायत विभागातून जनसुविधा, पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजना, कर वसुली, रोजगार हमी योजनायासह इतरही कामे चालतात. शिवाय ग्रामपंचायत पातळीवर झालेल्या अपहाराची चौकशीही याच विभागाकडून केली जाते. ग्रामसेवकांची आस्थापना पंचायत विभागातच आहे. त्यामुळे या सर्वांचा लेखाजोखाही येथेच ठेवावा लागतो. ग्रामीण भागातून विकासाच्या कामात अपहार झाल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत विभागात प्राप्त होतात. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत स्तरावरून कर वसुली, पाणीपट्टी वसुली यावरही नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी पाहिजे. जनसुविधेतून कोट्यवधीचा निधी दिला जातो. या निधीचे नियोजन ग्रामसेवकाकडून केले जात आहे. त्या दर्जाचा अधिकारीच नसल्याने कसेबसे काम काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. पंचायत विभागातील उपमुख्याधिकारी डॉ.प्रशांत रूमाले यांची बदली झाल्यानंतर पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. जिल्ह्यातील १६ पंचायत समित्या आणि १ हजार २०७ ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. मुळात पंचायत विभागातील पदस्थापनेची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रयत्न होताना दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)