शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 21:44 IST

Yawatmal News कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

ठळक मुद्देग्रामीण भागात सामूहिक पोळा झालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासन वारंवार जनतेला विनवणी करीत आहे. केरळमधील ओनम उत्सव तिसरी लाट पसरण्यास कारणीभूत ठरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात असा प्रकार घडू नये म्हणून कठोर अंमलबजावणीच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. या सूचनांचे पालन ग्रामीण भागात तंतोतंत होत आहे. मात्र शहरी भागात हा नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजणार तर नाही ना, अशी भीती अनेक अभ्यासकांना वाटत आहे.

(The danger of the third wave of corona spreading due to the well-educated?)

कोरोनाची पहिली लाट शहरांमध्येच पसरली होती. जिल्ह्यातील १७०० गावे पहिल्या लाटेच्या वेळेस सुरक्षित होती. दुसऱ्या लाटेच्या वेळेला शहरातून ग्रामीण भागात नागरिक गेल्याने ही लाट पसरली आणि नंतर ओसरली. आता तिसरी लाट पसरू नये म्हणून लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली जात आहे. यानंतरही केवळ १२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अजूनही ७८ टक्के नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. यानंतर सामूहिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या पोळा सणावर निर्बंध घालण्यात आले. यामुळे गावपातळीवर पोळा भरला नाही. आता तान्हा पोळाही भरणार नाही आणि मारबतची रॅली काढू नये अशा सूचना आहेत. हा नियम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना लागू आहे. मात्र शहरातील नागरिकांनी या नियमाकडे डोळेझाक केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने गावामध्ये ऑटो फिरवून गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या. जागोजागी पोलीस बंदोबस्त लावला. यानंतरही रस्त्यांवर गर्दी मावणार नाही इतके लोक बाहेर पडलेत. या गर्दीला नियंत्रणात आणणे कुणालाही शक्य झाले नाही. सायंकाळपर्यत संपूर्ण रस्ता नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.

विविध कपडे, खेळणी, विविध वस्तू विक्रीसाठी दुकाने लागली होती. त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. आता या ठिकाणी कोरोना नियमांचे पालनच झाले नाही. अनेक जण विनामास्क या ठिकाणी फिरत होते. खरेदीसाठी झुंबड उडाली होती. एका ठिकाणी ३०-४० नागरिकांचे जथ्थे खरेदीसाठी स्पर्धा करताना पहायला मिळत होते. नागरिकांच्या अशा वागण्याने कोरोना पसरला तर सर्वांनाच अवघड होणार आहे.

गर्दीवर नियंत्रण राहिलेच नाही

शहरातील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी दिवसभर गाड्या फिरल्यानंतरही दुकानांच्या बाहेर मोठमोठे स्टॉल लागले. याला अटकावच झाला नाही. परिणामी नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढत गेली. यातून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस