शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 21:44 IST

Yawatmal News कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

ठळक मुद्देग्रामीण भागात सामूहिक पोळा झालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासन वारंवार जनतेला विनवणी करीत आहे. केरळमधील ओनम उत्सव तिसरी लाट पसरण्यास कारणीभूत ठरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात असा प्रकार घडू नये म्हणून कठोर अंमलबजावणीच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. या सूचनांचे पालन ग्रामीण भागात तंतोतंत होत आहे. मात्र शहरी भागात हा नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजणार तर नाही ना, अशी भीती अनेक अभ्यासकांना वाटत आहे.

(The danger of the third wave of corona spreading due to the well-educated?)

कोरोनाची पहिली लाट शहरांमध्येच पसरली होती. जिल्ह्यातील १७०० गावे पहिल्या लाटेच्या वेळेस सुरक्षित होती. दुसऱ्या लाटेच्या वेळेला शहरातून ग्रामीण भागात नागरिक गेल्याने ही लाट पसरली आणि नंतर ओसरली. आता तिसरी लाट पसरू नये म्हणून लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली जात आहे. यानंतरही केवळ १२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अजूनही ७८ टक्के नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. यानंतर सामूहिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या पोळा सणावर निर्बंध घालण्यात आले. यामुळे गावपातळीवर पोळा भरला नाही. आता तान्हा पोळाही भरणार नाही आणि मारबतची रॅली काढू नये अशा सूचना आहेत. हा नियम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना लागू आहे. मात्र शहरातील नागरिकांनी या नियमाकडे डोळेझाक केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने गावामध्ये ऑटो फिरवून गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या. जागोजागी पोलीस बंदोबस्त लावला. यानंतरही रस्त्यांवर गर्दी मावणार नाही इतके लोक बाहेर पडलेत. या गर्दीला नियंत्रणात आणणे कुणालाही शक्य झाले नाही. सायंकाळपर्यत संपूर्ण रस्ता नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.

विविध कपडे, खेळणी, विविध वस्तू विक्रीसाठी दुकाने लागली होती. त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. आता या ठिकाणी कोरोना नियमांचे पालनच झाले नाही. अनेक जण विनामास्क या ठिकाणी फिरत होते. खरेदीसाठी झुंबड उडाली होती. एका ठिकाणी ३०-४० नागरिकांचे जथ्थे खरेदीसाठी स्पर्धा करताना पहायला मिळत होते. नागरिकांच्या अशा वागण्याने कोरोना पसरला तर सर्वांनाच अवघड होणार आहे.

गर्दीवर नियंत्रण राहिलेच नाही

शहरातील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी दिवसभर गाड्या फिरल्यानंतरही दुकानांच्या बाहेर मोठमोठे स्टॉल लागले. याला अटकावच झाला नाही. परिणामी नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढत गेली. यातून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस