शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 21:44 IST

Yawatmal News कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

ठळक मुद्देग्रामीण भागात सामूहिक पोळा झालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासन वारंवार जनतेला विनवणी करीत आहे. केरळमधील ओनम उत्सव तिसरी लाट पसरण्यास कारणीभूत ठरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात असा प्रकार घडू नये म्हणून कठोर अंमलबजावणीच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. या सूचनांचे पालन ग्रामीण भागात तंतोतंत होत आहे. मात्र शहरी भागात हा नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजणार तर नाही ना, अशी भीती अनेक अभ्यासकांना वाटत आहे.

(The danger of the third wave of corona spreading due to the well-educated?)

कोरोनाची पहिली लाट शहरांमध्येच पसरली होती. जिल्ह्यातील १७०० गावे पहिल्या लाटेच्या वेळेस सुरक्षित होती. दुसऱ्या लाटेच्या वेळेला शहरातून ग्रामीण भागात नागरिक गेल्याने ही लाट पसरली आणि नंतर ओसरली. आता तिसरी लाट पसरू नये म्हणून लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली जात आहे. यानंतरही केवळ १२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अजूनही ७८ टक्के नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. यानंतर सामूहिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या पोळा सणावर निर्बंध घालण्यात आले. यामुळे गावपातळीवर पोळा भरला नाही. आता तान्हा पोळाही भरणार नाही आणि मारबतची रॅली काढू नये अशा सूचना आहेत. हा नियम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना लागू आहे. मात्र शहरातील नागरिकांनी या नियमाकडे डोळेझाक केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने गावामध्ये ऑटो फिरवून गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या. जागोजागी पोलीस बंदोबस्त लावला. यानंतरही रस्त्यांवर गर्दी मावणार नाही इतके लोक बाहेर पडलेत. या गर्दीला नियंत्रणात आणणे कुणालाही शक्य झाले नाही. सायंकाळपर्यत संपूर्ण रस्ता नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.

विविध कपडे, खेळणी, विविध वस्तू विक्रीसाठी दुकाने लागली होती. त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. आता या ठिकाणी कोरोना नियमांचे पालनच झाले नाही. अनेक जण विनामास्क या ठिकाणी फिरत होते. खरेदीसाठी झुंबड उडाली होती. एका ठिकाणी ३०-४० नागरिकांचे जथ्थे खरेदीसाठी स्पर्धा करताना पहायला मिळत होते. नागरिकांच्या अशा वागण्याने कोरोना पसरला तर सर्वांनाच अवघड होणार आहे.

गर्दीवर नियंत्रण राहिलेच नाही

शहरातील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी दिवसभर गाड्या फिरल्यानंतरही दुकानांच्या बाहेर मोठमोठे स्टॉल लागले. याला अटकावच झाला नाही. परिणामी नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढत गेली. यातून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस