शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
4
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
5
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
6
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
7
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
8
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
11
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
12
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
13
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
14
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
15
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
16
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
17
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
18
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
19
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
20
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

आॅगस्टमध्ये डेंग्यूचा धोका

By admin | Updated: July 17, 2016 00:39 IST

पावसाळ्याची जेमतेम सुरुवात असल्याने डेंग्यूचा किंवा अन्य साथरोगांचा सध्या कुठेही उद्रेक नाही.

आरोग्य विभाग : पावसाळ्यातील प्रतिबंधक उपाययोजनांवर भर यवतमाळ : पावसाळ्याची जेमतेम सुरुवात असल्याने डेंग्यूचा किंवा अन्य साथरोगांचा सध्या कुठेही उद्रेक नाही. मात्र आॅगस्टनंतर डेंग्यूसारखे आजार डोके वर काढण्याची भीती आरोग्य विभागाला आहे. त्यामुळेच या विभागाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. उपाययोजनांबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. डॉ. राठोड म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांवर आरोग्य खात्याचे संपूर्ण लक्ष आहे. डेंग्यूची राज्याबाहेर चर्चा असली तरी महाराष्ट्रात अद्याप त्याचा कुठेही उद्रेक झाल्याचे ऐकिवात नाही. जिल्ह्यात साथरोगाचे मोठे उद्रेक नाही. परंतु आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यातून साथरोगांचा जन्म होतो. अनेक ठिकाणी साथीच्या आजाराचे मोठे उद्रेक होतात. आॅगस्टनंतर डेंग्यूसारखे आजारही डोके वर काढण्याची अधिक शक्यता असते. याबाबी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आतापासूनच विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या माध्यमातून अशा साथरोगांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे. नदी-नाल्याच्या काठावरील पूरग्रस्त गावांवर अधिक लक्ष दिले जात आहे. त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिक प्रमाणात औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता पाहता घरोघरी मेडिक्लोन हे लिक्वीड आरोग्य यंत्रणेबाबत पोहोचविले जात आहे. साथरोगांच्या उद्रेकाच्या वेळी जिल्ह्यात कुठेही उपकरणे, यंत्रणा, रुग्णवाहिका, औषधी याची अडचण निर्माण होणार नाही, याबाबतची खबरदारी आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे डॉ. के.झेड. राठोड यांनी सांगितले. साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी कंट्रोल रुम सुरू करण्यात आल्याचेही राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)