शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

विधवेच्या शेतीचे नुकसान

By admin | Updated: June 25, 2015 02:34 IST

तालुक्यातील टेंभी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला काढण्यात आल्याने शेतीचे दोन तुकडे पडले.

शेतामधून काढला नाला : जलयुक्त शिवार अभियान उठले मुळावरपांढरकवडा : तालुक्यातील टेंभी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला काढण्यात आल्याने शेतीचे दोन तुकडे पडले. परिणामी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.तालुक्यातील टेंभी येथील देविदास गांगुलवार या शेतकऱ्याने सन २०१० मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या शेतात कुटुंबिय कसेतरी उत्पन्न घेत होते. आता नुकतेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत त्यांच्या शेतात नालीचे खोलीकरण करण्यात आले. त्या नाल्याजवळ असलेल्या शेतातील ४२ सागवान वृक्षाची कत्तल त्यासाठी करण्यात आली. विशेष म्हणजे खोलीकरणासाठी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या संगनमताने त्यांच्या शेतातील हे तोडलेले सर्व सागवान आंधप्रदेशात विकल्याचा आरोप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाने केला आहे.विशेष म्हणजे गांगुलवार यांचे शेत एकाबाजूने उतार भाग असून त्या ठिकाणी निसर्गत: नाला नव्हताच. मात्र त्यांच्या शेतात जबरीने खोदकाम करून त्या शेताचे दोन भाग केले व शेतात नाला निर्माण केला. त्यामुळे शेताचे मोठे नुकसान झाले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी आहे. या शेतातील सागवान वृक्ष विकून किंवा शेत विकून मुलीचे लग्न करण्याच्या बेतात मृतक देविदास गांगुलवार यांची विधवा पत्नी कमल गांगुलवार होती. मात्र जलयुक्त शिवार अभियानांतर्गत त्यांच्या शेताची दशाच बदलवून टाकण्यात आली आहे.आता शेताचे दोन भाग झाल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जातासुद्धा येत नाही. शेतातील सागवन वृक्षही नष्ट करण्यात आले. त्यांनी २६ जूनच्या दरबारातही त्याची तक्रार केली. मात्र आता हा दरबार ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द झाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय शेतात लाखो रूपयांचे खोदकाम करण्यात आले. या कामामुळे कोणत्याही शेतकऱ्याला लाभ झाला नाही. उलट शेतकऱ्यांचे नुकसानच झाले असून त्यामुळे शेतकरी कुटुंब आता उध्वस्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)