शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

विधवेच्या शेतीचे नुकसान

By admin | Updated: June 25, 2015 02:34 IST

तालुक्यातील टेंभी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला काढण्यात आल्याने शेतीचे दोन तुकडे पडले.

शेतामधून काढला नाला : जलयुक्त शिवार अभियान उठले मुळावरपांढरकवडा : तालुक्यातील टेंभी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला काढण्यात आल्याने शेतीचे दोन तुकडे पडले. परिणामी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.तालुक्यातील टेंभी येथील देविदास गांगुलवार या शेतकऱ्याने सन २०१० मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या शेतात कुटुंबिय कसेतरी उत्पन्न घेत होते. आता नुकतेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत त्यांच्या शेतात नालीचे खोलीकरण करण्यात आले. त्या नाल्याजवळ असलेल्या शेतातील ४२ सागवान वृक्षाची कत्तल त्यासाठी करण्यात आली. विशेष म्हणजे खोलीकरणासाठी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या संगनमताने त्यांच्या शेतातील हे तोडलेले सर्व सागवान आंधप्रदेशात विकल्याचा आरोप आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाने केला आहे.विशेष म्हणजे गांगुलवार यांचे शेत एकाबाजूने उतार भाग असून त्या ठिकाणी निसर्गत: नाला नव्हताच. मात्र त्यांच्या शेतात जबरीने खोदकाम करून त्या शेताचे दोन भाग केले व शेतात नाला निर्माण केला. त्यामुळे शेताचे मोठे नुकसान झाले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी आहे. या शेतातील सागवान वृक्ष विकून किंवा शेत विकून मुलीचे लग्न करण्याच्या बेतात मृतक देविदास गांगुलवार यांची विधवा पत्नी कमल गांगुलवार होती. मात्र जलयुक्त शिवार अभियानांतर्गत त्यांच्या शेताची दशाच बदलवून टाकण्यात आली आहे.आता शेताचे दोन भाग झाल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जातासुद्धा येत नाही. शेतातील सागवन वृक्षही नष्ट करण्यात आले. त्यांनी २६ जूनच्या दरबारातही त्याची तक्रार केली. मात्र आता हा दरबार ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द झाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय शेतात लाखो रूपयांचे खोदकाम करण्यात आले. या कामामुळे कोणत्याही शेतकऱ्याला लाभ झाला नाही. उलट शेतकऱ्यांचे नुकसानच झाले असून त्यामुळे शेतकरी कुटुंब आता उध्वस्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)