शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

दिग्रस तालुक्यात उभ्या सोयाबीन पिकाचे नुकसान

By admin | Updated: October 23, 2016 02:00 IST

यंदा शेतकऱ्यांना पावसाने मोठा दगा दिला. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसाचा फटका : पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणीदिग्रस : यंदा शेतकऱ्यांना पावसाने मोठा दगा दिला. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असा टाहो तालुकाभरातील सोयाबीन उत्पादक फोडत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक सुरुवात केली. तत्पूर्वी हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. नगदी पीक आणि चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पीकही जोमात आले होते. परंतु मध्यंतरी पावसाने दीर्घ काळ दडी मारली. यात उभे सोयाबीन वाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. कसेबसे सोयाबीन जगविण्यात शेतकऱ्यांनी यश मिळविले. मात्र सप्टेंबरच्या मध्यात परतीचा पाऊस सुरु झाला. हा पाऊसही धडाकेबाज असल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊ लागले. सोयाबीनच्या झाडांना शेंगा लगडलेल्या असताना सततच्या पावसामुळे या शेंगांना कोंब फुटले आणि शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. तालुक्यातील चिरकुटा या गावातील सोयाबीन उत्पादकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शामसुंदर विठ्ठलराव इरतकर यांनी आपल्या संपूर्ण शेतात यंदा सोयाबीनचीच पेरणी केली होती. पीक परिपक्व होऊन काढणीस आले होते. परंतु सतत सुरू असलेल्या पावसाने शेंगांना कोंब येऊन पूर्णत: नुकसान झाले. शामसुंदर इरतकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिग्रस शाखेतून रिलायन्स कंपनीचा पीक विमा काढला होता. या विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता तो क्रमांक सतत व्यस्त येत आहे. त्यामुळे निराश झालेल्या या शेतकऱ्याने तहसीलमध्ये धाव घेत निवेदन दिले. नुकसानीची तत्काळ मोका पाहणी करून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे केली. शामसुंदर इरतकर यांच्या प्रमाणेच तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची अवस्था आहे. सोयाबीनचे पीक हाताशी आलेले असताना निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. यामुळे तालुकाभरातील शेतकरी संकटात सापडले आहे. दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)दिवाळीवर अंधाराचे सावट बेभरवश्याच्या पावसामुळे यंदा दिवाळीपूर्वी कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येऊ शकले नाही. शिवाय काही अपवाद वगळल्यास अद्याप कापसाची खरेदीही सुरू झाली नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सोयाबीनचे पीक चांगल्या अवस्थेत दिसल्याने सोयाबीन विकूनच दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत शेतकरी होते. परंतु परतीच्या पावसाने हाताशी आलेले सोयाबीनचे पीक नासवले. शिवाय कसेबसे सोंगणी केलेल्या सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती आहे.