शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस तालुक्यात उभ्या सोयाबीन पिकाचे नुकसान

By admin | Updated: October 23, 2016 02:00 IST

यंदा शेतकऱ्यांना पावसाने मोठा दगा दिला. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसाचा फटका : पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणीदिग्रस : यंदा शेतकऱ्यांना पावसाने मोठा दगा दिला. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असा टाहो तालुकाभरातील सोयाबीन उत्पादक फोडत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक सुरुवात केली. तत्पूर्वी हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. नगदी पीक आणि चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पीकही जोमात आले होते. परंतु मध्यंतरी पावसाने दीर्घ काळ दडी मारली. यात उभे सोयाबीन वाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. कसेबसे सोयाबीन जगविण्यात शेतकऱ्यांनी यश मिळविले. मात्र सप्टेंबरच्या मध्यात परतीचा पाऊस सुरु झाला. हा पाऊसही धडाकेबाज असल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊ लागले. सोयाबीनच्या झाडांना शेंगा लगडलेल्या असताना सततच्या पावसामुळे या शेंगांना कोंब फुटले आणि शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. तालुक्यातील चिरकुटा या गावातील सोयाबीन उत्पादकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शामसुंदर विठ्ठलराव इरतकर यांनी आपल्या संपूर्ण शेतात यंदा सोयाबीनचीच पेरणी केली होती. पीक परिपक्व होऊन काढणीस आले होते. परंतु सतत सुरू असलेल्या पावसाने शेंगांना कोंब येऊन पूर्णत: नुकसान झाले. शामसुंदर इरतकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिग्रस शाखेतून रिलायन्स कंपनीचा पीक विमा काढला होता. या विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता तो क्रमांक सतत व्यस्त येत आहे. त्यामुळे निराश झालेल्या या शेतकऱ्याने तहसीलमध्ये धाव घेत निवेदन दिले. नुकसानीची तत्काळ मोका पाहणी करून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे केली. शामसुंदर इरतकर यांच्या प्रमाणेच तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची अवस्था आहे. सोयाबीनचे पीक हाताशी आलेले असताना निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. यामुळे तालुकाभरातील शेतकरी संकटात सापडले आहे. दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)दिवाळीवर अंधाराचे सावट बेभरवश्याच्या पावसामुळे यंदा दिवाळीपूर्वी कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येऊ शकले नाही. शिवाय काही अपवाद वगळल्यास अद्याप कापसाची खरेदीही सुरू झाली नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सोयाबीनचे पीक चांगल्या अवस्थेत दिसल्याने सोयाबीन विकूनच दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत शेतकरी होते. परंतु परतीच्या पावसाने हाताशी आलेले सोयाबीनचे पीक नासवले. शिवाय कसेबसे सोंगणी केलेल्या सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती आहे.