शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

डाळ उतरली, भाजी तेज

By admin | Updated: August 18, 2016 01:16 IST

वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

यवतमाळ : वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच परिणाम डाळींच्या किमतीवर दिसून येत आहे. डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या सोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या दरात मात्र तेजी आहे. परंतु इतर वस्तुंची किंमत कमी झाल्यामुळे गृहिणींचे बजेट काही प्रमाणात का होईना सावरले आहे. आकाशाला भिडणाऱ्या तूर डाळीच्या किमतीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. यामुळे केंद्र शासनाने मोठया प्रमाणात डाळीची आयात केली आहे. याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. डाळीचे दर किलो मागे २० ते ३० रूपयाने कमी झाले आहेत. तर सिलिंडरचे दर ५५ रूपयाने घसरले आहेत. भाजीपाल्याच्या किमती किंचित वधारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तूर डाळींचे दर १६० रूपयांवर पोहचले होते. हे दर आता १०० ते ११० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. यामध्ये ४० ते ५० रूपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. सव्वा नंबर तूर डाळ ११० रूपयांवरून ९५ ते ९८ रूपये किलोवर आली आहे. चनाडाळ ११० रूपयांवरून ९० रूपयांपर्यंत खाली आली आहे. उडदाची डाळ १४५ रूपयावरून १२० रूपयांपर्यंत घसरली आहे. मुगडाळ ८० रूपयांवरून ७५ रूपयापर्यंत खाली आली आहे. मसूर डाळ ७५ रूपये आहे. वटाना ४० रूपये, चना ७० रूपये, बरबटी ५६ रूपये, ज्वारी १८ ते २० रूपये किलो आहे. (शहर वार्ताहर) चढ-उतार कायम काही भाज्यांच्या किमती घसरल्या आहेत. टमाटरचे दर १० रूपये किलो व काकडी २० रूपये किलो आहे. वांग्याचे दर ५० रूपये किलोच्या घरात पोहचले आहेत. भेंडी, बरबटी, शेपू, मुग आणि कारल्याचे दर ४० रूपये किलोच्या घरात आहे. गव्हार, दोडके, ढेमस, सांभार आणि गवार शेंगांचे दर ५० रूपये किलोच्या घरात आहे. फुलकोबी, पालक, अद्रक आणि करवंद यांचे दर ६० रूपये किलोच्या घरात आहे. गुळ व साखरेचा गोडवा महागला बाजारात गुळाच्या आणि साखरीच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. तर मिरचीचे दर घसरले आहेत. ठोक दरांवर नजर टाकल्यास साखर ३५ रूपयांवरून ४० रूपये किलो तर गुळ ४० रूपयांवरून ५० रूपये किलोच्या घरात पोहचला आहे. मिरचीचे दर १८० रूपयांवरून १६० वर घसरले आहे.