शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डाळ उतरली, भाजी तेज

By admin | Updated: August 18, 2016 01:16 IST

वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

यवतमाळ : वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच परिणाम डाळींच्या किमतीवर दिसून येत आहे. डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या सोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या दरात मात्र तेजी आहे. परंतु इतर वस्तुंची किंमत कमी झाल्यामुळे गृहिणींचे बजेट काही प्रमाणात का होईना सावरले आहे. आकाशाला भिडणाऱ्या तूर डाळीच्या किमतीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. यामुळे केंद्र शासनाने मोठया प्रमाणात डाळीची आयात केली आहे. याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. डाळीचे दर किलो मागे २० ते ३० रूपयाने कमी झाले आहेत. तर सिलिंडरचे दर ५५ रूपयाने घसरले आहेत. भाजीपाल्याच्या किमती किंचित वधारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तूर डाळींचे दर १६० रूपयांवर पोहचले होते. हे दर आता १०० ते ११० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. यामध्ये ४० ते ५० रूपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. सव्वा नंबर तूर डाळ ११० रूपयांवरून ९५ ते ९८ रूपये किलोवर आली आहे. चनाडाळ ११० रूपयांवरून ९० रूपयांपर्यंत खाली आली आहे. उडदाची डाळ १४५ रूपयावरून १२० रूपयांपर्यंत घसरली आहे. मुगडाळ ८० रूपयांवरून ७५ रूपयापर्यंत खाली आली आहे. मसूर डाळ ७५ रूपये आहे. वटाना ४० रूपये, चना ७० रूपये, बरबटी ५६ रूपये, ज्वारी १८ ते २० रूपये किलो आहे. (शहर वार्ताहर) चढ-उतार कायम काही भाज्यांच्या किमती घसरल्या आहेत. टमाटरचे दर १० रूपये किलो व काकडी २० रूपये किलो आहे. वांग्याचे दर ५० रूपये किलोच्या घरात पोहचले आहेत. भेंडी, बरबटी, शेपू, मुग आणि कारल्याचे दर ४० रूपये किलोच्या घरात आहे. गव्हार, दोडके, ढेमस, सांभार आणि गवार शेंगांचे दर ५० रूपये किलोच्या घरात आहे. फुलकोबी, पालक, अद्रक आणि करवंद यांचे दर ६० रूपये किलोच्या घरात आहे. गुळ व साखरेचा गोडवा महागला बाजारात गुळाच्या आणि साखरीच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. तर मिरचीचे दर घसरले आहेत. ठोक दरांवर नजर टाकल्यास साखर ३५ रूपयांवरून ४० रूपये किलो तर गुळ ४० रूपयांवरून ५० रूपये किलोच्या घरात पोहचला आहे. मिरचीचे दर १८० रूपयांवरून १६० वर घसरले आहे.