शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

डाळ उतरली, भाजी तेज

By admin | Updated: August 18, 2016 01:16 IST

वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

यवतमाळ : वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच परिणाम डाळींच्या किमतीवर दिसून येत आहे. डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या सोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या दरात मात्र तेजी आहे. परंतु इतर वस्तुंची किंमत कमी झाल्यामुळे गृहिणींचे बजेट काही प्रमाणात का होईना सावरले आहे. आकाशाला भिडणाऱ्या तूर डाळीच्या किमतीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. यामुळे केंद्र शासनाने मोठया प्रमाणात डाळीची आयात केली आहे. याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. डाळीचे दर किलो मागे २० ते ३० रूपयाने कमी झाले आहेत. तर सिलिंडरचे दर ५५ रूपयाने घसरले आहेत. भाजीपाल्याच्या किमती किंचित वधारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तूर डाळींचे दर १६० रूपयांवर पोहचले होते. हे दर आता १०० ते ११० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. यामध्ये ४० ते ५० रूपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. सव्वा नंबर तूर डाळ ११० रूपयांवरून ९५ ते ९८ रूपये किलोवर आली आहे. चनाडाळ ११० रूपयांवरून ९० रूपयांपर्यंत खाली आली आहे. उडदाची डाळ १४५ रूपयावरून १२० रूपयांपर्यंत घसरली आहे. मुगडाळ ८० रूपयांवरून ७५ रूपयापर्यंत खाली आली आहे. मसूर डाळ ७५ रूपये आहे. वटाना ४० रूपये, चना ७० रूपये, बरबटी ५६ रूपये, ज्वारी १८ ते २० रूपये किलो आहे. (शहर वार्ताहर) चढ-उतार कायम काही भाज्यांच्या किमती घसरल्या आहेत. टमाटरचे दर १० रूपये किलो व काकडी २० रूपये किलो आहे. वांग्याचे दर ५० रूपये किलोच्या घरात पोहचले आहेत. भेंडी, बरबटी, शेपू, मुग आणि कारल्याचे दर ४० रूपये किलोच्या घरात आहे. गव्हार, दोडके, ढेमस, सांभार आणि गवार शेंगांचे दर ५० रूपये किलोच्या घरात आहे. फुलकोबी, पालक, अद्रक आणि करवंद यांचे दर ६० रूपये किलोच्या घरात आहे. गुळ व साखरेचा गोडवा महागला बाजारात गुळाच्या आणि साखरीच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. तर मिरचीचे दर घसरले आहेत. ठोक दरांवर नजर टाकल्यास साखर ३५ रूपयांवरून ४० रूपये किलो तर गुळ ४० रूपयांवरून ५० रूपये किलोच्या घरात पोहचला आहे. मिरचीचे दर १८० रूपयांवरून १६० वर घसरले आहे.