शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसाय डबघाईस

By admin | Updated: May 25, 2014 23:56 IST

यावर्षी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात नैसगिक प्रकोप झाला. प्रथम अतवृदष्टीमुळे खरिपाचा हंगाम गेला. त्यानंतर गारपिटीमुळे रबी हंगामही हातातून निघून गेला. अशावेळी शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून राहण्याशिवाय

यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात नैसगिक प्रकोप झाला. प्रथम अतवृदष्टीमुळे खरिपाचा हंगाम गेला. त्यानंतर गारपिटीमुळे रबी हंगामही हातातून निघून गेला. अशावेळी शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून राहण्याशिवाय शेतकर्‍यांपुढे दुसरा पर्याय नाही. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी शेतीलापूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला पसंती देतात. परंतु बँकांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यामध्ये असलेल्या उदासीनतेमुळे आता हा व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना डेअरी क्षेत्रात जोडधंद्यातून आधार देण्यासाठी गायी, म्हशी, शेळ्या खरेदीकरिता जिल्हा ऋण योजनेतून यावर्षी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. वर्ष संपले तरी एकाही राष्ट्रीयीकृत बँकेने कर्जप्रकरण मंजूर केले नाही.

ठरविल्याप्रमाणे कर्जप्रकरणे वेळोवेळी मंजूर झाली असती तर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना दुधाळ जनावरे मिळून जोडधंदा करता आला असता. कर्जाच्या खाईतून बाहेर निघून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग गवसला असता. यवतमाळ जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यात थोड्याफार फरकाने हिच स्थिती आहे. यावरून शासकीय योजनांचा लाभ जनतेला वेळीच मिळत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत अपयश आले असताना लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न नागरिकातून केला जात आहे. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे कर्ज गाय, म्हैस खरेदीसाठी वाटपाचे निश्‍चित करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही शाखांनी काही मोजक्या केसेस बकर्‍या खरेदीसाठी केल्या. पण, ग्रामीण व राष्ट्रीयीकृत बँकांनी दोनही बाबतीत वर्षभर उदासीन धोरण राबविले आहे.

पशुसंवर्धन विभागाने गतवर्षी गरजू व पात्र लाभार्थ्यांंना विविध बँकांकडे प्रस्तावासह वेळोवेळी पाठविले होते. पण गरजवंतांना वर्षभर दुधाळ जनावरांसाठी कर्ज मिळाले नाही.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील केवळ पशुसंवर्धन विभागाचीच ही स्थिती आहे. असे नव्हे तर समाज कल्याण, कृषी व आरोग्य विभागाच्या विविध विकास कामाचा निधी जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत फार मोठय़ा प्रमाणात खर्च झाला नव्हता. त्यावेळी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी प्रश्नांची भडीमार करून जाब विचारला होता. त्यानंतर तरी इतर विभागाचा निधी खर्च होईल, कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा असताना हा नवा प्रकार समोर आला आहे.

कर्जप्रकरणेच मार्गी लागत नसल्याने शेतीपूरक व्यवसाय कसे सुरू करावे, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. (प्रतिनिधी)