शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दादा गटाच्या एन्ट्रीने माणिकरावांना धक्का

By admin | Updated: September 24, 2014 23:41 IST

गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या

यवतमाळ : गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला आहे. विशेष असे दादा गटाची एन्ट्री मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झाल्याने भविष्यात या विरोधाच्या ठिणग्या पडण्याचीही शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, संचालक प्रफुल्ल मानकर यांच्या नेतृत्वात उत्तमराव पाटील समर्थकांनी बुधवारी लोणी येथे अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र दादा गटाचे अद्याप राष्ट्रवादीत असलेले अनेक समर्थक केव्हा प्रवेश घेणार याची चर्चाही बैठक स्थळी होती. दादा गट काँग्रेसमध्ये जाणार असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनीष पाटलांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आधी सोडा असे फर्मानही दिले होते, अशी माहिती आहे. मात्र मनीष पाटलांनी हे फर्मान जुमानले नाही. राष्ट्रवादीत जाण्याचा आमचा निर्णय चुकीचा होता, त्याबाबत पश्चाताप होत आहे, असे मनीष पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. दादा गटाच्या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उत्तमराव पाटील यांचे बंधू जीवन पाटील यांनी यवतमाळ-वाशिमची लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. त्यावेळी तुमच्या मागे नेमके कोण आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर आता जीवन पाटलांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्र्यांमार्फत फिल्डींग लावली. जुनाच प्रश्न पुन्हा उपस्थित झाल्याने राष्ट्रवादीतील आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मात्र त्यासाठी उमेदवारीची अट घातली गेली. दादा गटाच्या नेत्यांनी अलिकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेश काँग्रेस हा वाद सर्वश्रृत आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळ जिल्ह्याचे असताना त्यांना बाजूला ठेऊन दादा गटाने थेट मुख्यमंत्र्यांशी संधान बांधल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा ठाकरे-पाटील गटाचा वाद कधी काळी थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता, याचे विस्मरण जिल्ह्यातील जनतेला अद्याप झाले नाही. हा वाद दादा गट राष्ट्रवादीत गेल्याने बाजूला पडला होता. मात्र आता त्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये एन्ट्री झाल्याने भविष्यात जुना राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दादा गटाच्या काँग्रेस प्रवेशापासून माणिकरावांनी स्वत:ला सुरुवातीपासूनच अलिप्त ठेवले. त्यावरून त्यांची नाराजी स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)