शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दादा गटाच्या एन्ट्रीने माणिकरावांना धक्का

By admin | Updated: September 24, 2014 23:41 IST

गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या

यवतमाळ : गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला आहे. विशेष असे दादा गटाची एन्ट्री मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झाल्याने भविष्यात या विरोधाच्या ठिणग्या पडण्याचीही शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, संचालक प्रफुल्ल मानकर यांच्या नेतृत्वात उत्तमराव पाटील समर्थकांनी बुधवारी लोणी येथे अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र दादा गटाचे अद्याप राष्ट्रवादीत असलेले अनेक समर्थक केव्हा प्रवेश घेणार याची चर्चाही बैठक स्थळी होती. दादा गट काँग्रेसमध्ये जाणार असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनीष पाटलांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आधी सोडा असे फर्मानही दिले होते, अशी माहिती आहे. मात्र मनीष पाटलांनी हे फर्मान जुमानले नाही. राष्ट्रवादीत जाण्याचा आमचा निर्णय चुकीचा होता, त्याबाबत पश्चाताप होत आहे, असे मनीष पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. दादा गटाच्या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उत्तमराव पाटील यांचे बंधू जीवन पाटील यांनी यवतमाळ-वाशिमची लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. त्यावेळी तुमच्या मागे नेमके कोण आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर आता जीवन पाटलांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्र्यांमार्फत फिल्डींग लावली. जुनाच प्रश्न पुन्हा उपस्थित झाल्याने राष्ट्रवादीतील आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मात्र त्यासाठी उमेदवारीची अट घातली गेली. दादा गटाच्या नेत्यांनी अलिकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेश काँग्रेस हा वाद सर्वश्रृत आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळ जिल्ह्याचे असताना त्यांना बाजूला ठेऊन दादा गटाने थेट मुख्यमंत्र्यांशी संधान बांधल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा ठाकरे-पाटील गटाचा वाद कधी काळी थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता, याचे विस्मरण जिल्ह्यातील जनतेला अद्याप झाले नाही. हा वाद दादा गट राष्ट्रवादीत गेल्याने बाजूला पडला होता. मात्र आता त्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये एन्ट्री झाल्याने भविष्यात जुना राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दादा गटाच्या काँग्रेस प्रवेशापासून माणिकरावांनी स्वत:ला सुरुवातीपासूनच अलिप्त ठेवले. त्यावरून त्यांची नाराजी स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)