शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

यवतमाळ येथे डाळ क्लस्टर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 00:58 IST

यवतमाळ व यवतमाळ लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा या भागात डाळीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे.

हंसराज अहीर : कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिले प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यवतमाळ : यवतमाळ व यवतमाळ लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा या भागात डाळीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या दाळीला चांगला भाव मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथे दाळ क्लस्टर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी चंद्रपूर येथे शनिवारी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला यवतमाळ कृषी उपसंचालक पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक इंगळे, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय पवार, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माचे प्रभारी प्रकल्प संचालक अशोक मगत व जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात दाळीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येवून त्यांना जास्तीत जास्त उत्पादनात कसे वाढेल यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नाही, अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करुन पाठवावे, असेही ते म्हणाले. हळद, मिरची, हरभरा, कापूस इत्यादी पिके ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जातात, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या उत्पादनात कशी वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना बि-बियाणांचे वाटप करण्यात आले, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जावून त्यांच्या पिकांची पाहणी करुन त्यांनासुद्धा काही मार्गदर्शन करता येईल का, यावरसुद्धा भर दिला पाहिजे, असे अहीर यांनी सांगितले. त्या शेतकऱ्यांना खताचे वाटपसुद्धा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून फळबाग, भाजीपाला, दूधव्यवसाय व मधमाशी पालनासारखा जोडधंदा करण्यासाठी प्रोस्ताहित करण्यात यावे. तो जोडधंदा करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना सर्व प्रकारची मदतसुद्धा कृषी विभागातर्फे देण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असून त्यांनी विद्युत विभागाकडे विद्युत मिटरसाठी पैसे भरले आहे. परंतु त्यांना अद्यापही विद्युत मीटर मिळाले नसेल, अशा शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करुन त्यांना विद्युत मीटर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असेही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यात ज्या गावात नर्सरीसाठी खुली जागा ठेवण्यात आलेली आहे, अशा जागेवर भाजीपाला व फळबाग निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)