शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ येथे डाळ क्लस्टर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 00:58 IST

यवतमाळ व यवतमाळ लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा या भागात डाळीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे.

हंसराज अहीर : कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिले प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यवतमाळ : यवतमाळ व यवतमाळ लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा या भागात डाळीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या दाळीला चांगला भाव मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथे दाळ क्लस्टर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी चंद्रपूर येथे शनिवारी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला यवतमाळ कृषी उपसंचालक पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक इंगळे, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय पवार, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माचे प्रभारी प्रकल्प संचालक अशोक मगत व जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात दाळीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येवून त्यांना जास्तीत जास्त उत्पादनात कसे वाढेल यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नाही, अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करुन पाठवावे, असेही ते म्हणाले. हळद, मिरची, हरभरा, कापूस इत्यादी पिके ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जातात, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या उत्पादनात कशी वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना बि-बियाणांचे वाटप करण्यात आले, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जावून त्यांच्या पिकांची पाहणी करुन त्यांनासुद्धा काही मार्गदर्शन करता येईल का, यावरसुद्धा भर दिला पाहिजे, असे अहीर यांनी सांगितले. त्या शेतकऱ्यांना खताचे वाटपसुद्धा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून फळबाग, भाजीपाला, दूधव्यवसाय व मधमाशी पालनासारखा जोडधंदा करण्यासाठी प्रोस्ताहित करण्यात यावे. तो जोडधंदा करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना सर्व प्रकारची मदतसुद्धा कृषी विभागातर्फे देण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असून त्यांनी विद्युत विभागाकडे विद्युत मिटरसाठी पैसे भरले आहे. परंतु त्यांना अद्यापही विद्युत मीटर मिळाले नसेल, अशा शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करुन त्यांना विद्युत मीटर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असेही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यात ज्या गावात नर्सरीसाठी खुली जागा ठेवण्यात आलेली आहे, अशा जागेवर भाजीपाला व फळबाग निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)