शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सांस्कृतिक कार्यक्रमांची होती वर्षभर रेलचेल

By admin | Updated: December 30, 2015 03:00 IST

सांस्कृतिक चळवळीत सदैव अग्रेसर असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल होती.

संगीताच्याही मैफल : समतापर्व आणि स्मृतिपर्वातून वैचारिक मेजवाणी यवतमाळ : सांस्कृतिक चळवळीत सदैव अग्रेसर असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल होती. राज्य नाट्यस्पर्धेसाठी सात नाटकांची निवड यवतमाळच्या नाट्य चळवळीला बळ देणारी ठरली. तर समतापर्व आणि स्मृतीपर्वातून यवतमाळकरांना सरत्या वर्षाने वैचारिक मेजवाणी दिली. सुप्रसिद्ध गायक भीमराव पांचाळे यांच्या ‘शब्द सुरांच्या भाव यात्रे’ने सरत्या वर्षाची सुरूवात झाली होती. विदर्भ युवा विकास मंचच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाने श्रोत्यांवर स्वरांची जादुई बरसात केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा येथील ‘प्रेरणास्थळा’वर आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे स्फुलिंग चेतविले. सरत्या वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यवतमाळकरांना शिवकाळात घेऊन जाणारे शिवकालिन शस्त्र प्रदर्शन होय. यवतमाळच्या गुरूदेव मंगल कार्यालयात गिरीश जाधव यांच्या संग्रहातील शस्त्रात्रांचे प्रदर्शन मेजवानी ठरले.सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीला बळ देणाऱ्या समता पर्वाची यवतमाळकर वर्षभर वाट पहात असतात. सरत्या वर्षात एप्रिल महिन्यात महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. सफाई कामगार आंदोलनाचे नेते बेजवाडा विल्सन यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. समता पर्वातील यवतमाळ आयडॉलने नवोदित गायकांचा शोध घेतला. चित्रपटसृष्टीशी सरत्या वर्षाने नाते जोडले. शेतकरी आत्महत्यांवर आधारित आत्मदाह हा चित्रपट प्रदर्शित झाला. कलावंत आणि छायाचित्रणही यवतमाळ जिल्ह्यातच झाले. या चित्रपटाने शेतकरी आत्महत्यांवर प्रकाश टाकून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्वाचे आयोजन यवतमाळकरांना वैचारिक मेजवानी देणारे ठरले. विविध विषयांवर या स्मृतीपर्वात मंथन झाले. यवतमाळ ही हौशी कलावंतांची नगरी आहे. या नगरीने अनेक नाट्यकलावंत दिले आहेत. अशाच या यवतमाळ नगरीतील एक-दोन नव्हे तर तब्बल सात नाटके राज्य स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात ‘व्वा! वाटेल ते प्रेमासाठी’, ‘अभिनेत्री’, ‘तप्त दहाही दिशा’, ‘खेळ’, ‘आसूरबा’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ ही नाटके चंद्रपूरच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत सहभागी झाली होती. (नगर प्रतिनिधी)