शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेततळ्याच्या सिंचनातून पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:33 IST

जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक शेततळे खोदण्याचा बहुमान यवतमाळ जिल्ह्याला मिळाला. आता पावसात खंड पडल्यामुळे संकटात सापडलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी .......

ठळक मुद्देयोजनेचा प्रत्यक्ष लाभ : यवतमाळ जिल्हा ठरला राज्यात अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक शेततळे खोदण्याचा बहुमान यवतमाळ जिल्ह्याला मिळाला. आता पावसात खंड पडल्यामुळे संकटात सापडलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी याच शेततळ्यातील पाण्याचा वापर करून सिंचन करत आहे. शेततळे खऱ्या अर्थाने पिकांसाठी संजीवनीचे काम करत आहे.दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्या यामुळे गाजत असलेल्या जिल्ह्यात पाय ठेवताच जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सर्व प्रथम महत्त्वाकांक्षी शेततळे योजना हातात घेतली. या योजनेतून आतापर्यंत सहा हजार ४७८ शेततळे पूर्ण करण्यात आले. ८० शेततळ्यांचे अजूनही काम सुरू आहे. पहिल्याच पावसात शेततळे तुडुंब भरले आहे. पावसाचा अंदाज घेत खरिपाची पेरणी केली. मात्र नेहमीप्रमाणे पावसाने यावर्षीही दगा दिला. जिल्ह्यातील काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशाही स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्याचा लाभ घेतला त्यांनी तळ्यातील पाण्यातून हंगामी सिंचनाला सुरुवात केली. स्प्रिंकलरच्या सहायाने पिकांना खंड पडलेल्या काळात वाचविण्यात शेतकºयांना यश आले आहे. शासकीय योजना राबवल्यानंतर काही आठवड्यातच त्याचे सकारात्मक परिणाम येण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. अनेक शेतकऱ्यांना शेततळ्यामुळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका मिळाली आहे. हंगामी सिंचन होत असले तरी नेमक्या पेरणीच्या काळात शेततळ्यातील पाण्याचा वापर करता येतो. अनेक शेतकऱ्यांनी आॅईल इंजीन बसवून सिंचन सुरू केले आहे. आता त्यांचे पीक जमिनीबाहेर आले असून हिरवे स्वप्न साकार होताना दिसत आहे.