शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याच्या सिंचनातून पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:33 IST

जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक शेततळे खोदण्याचा बहुमान यवतमाळ जिल्ह्याला मिळाला. आता पावसात खंड पडल्यामुळे संकटात सापडलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी .......

ठळक मुद्देयोजनेचा प्रत्यक्ष लाभ : यवतमाळ जिल्हा ठरला राज्यात अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक शेततळे खोदण्याचा बहुमान यवतमाळ जिल्ह्याला मिळाला. आता पावसात खंड पडल्यामुळे संकटात सापडलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी याच शेततळ्यातील पाण्याचा वापर करून सिंचन करत आहे. शेततळे खऱ्या अर्थाने पिकांसाठी संजीवनीचे काम करत आहे.दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्या यामुळे गाजत असलेल्या जिल्ह्यात पाय ठेवताच जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सर्व प्रथम महत्त्वाकांक्षी शेततळे योजना हातात घेतली. या योजनेतून आतापर्यंत सहा हजार ४७८ शेततळे पूर्ण करण्यात आले. ८० शेततळ्यांचे अजूनही काम सुरू आहे. पहिल्याच पावसात शेततळे तुडुंब भरले आहे. पावसाचा अंदाज घेत खरिपाची पेरणी केली. मात्र नेहमीप्रमाणे पावसाने यावर्षीही दगा दिला. जिल्ह्यातील काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशाही स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्याचा लाभ घेतला त्यांनी तळ्यातील पाण्यातून हंगामी सिंचनाला सुरुवात केली. स्प्रिंकलरच्या सहायाने पिकांना खंड पडलेल्या काळात वाचविण्यात शेतकºयांना यश आले आहे. शासकीय योजना राबवल्यानंतर काही आठवड्यातच त्याचे सकारात्मक परिणाम येण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. अनेक शेतकऱ्यांना शेततळ्यामुळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका मिळाली आहे. हंगामी सिंचन होत असले तरी नेमक्या पेरणीच्या काळात शेततळ्यातील पाण्याचा वापर करता येतो. अनेक शेतकऱ्यांनी आॅईल इंजीन बसवून सिंचन सुरू केले आहे. आता त्यांचे पीक जमिनीबाहेर आले असून हिरवे स्वप्न साकार होताना दिसत आहे.