शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पांढरकवडा येथील बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण पांढरकवडा : शहरातील रस्त्याकडेच्या अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात बेशिस्तपणा वाढला ...

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण

पांढरकवडा : शहरातील रस्त्याकडेच्या अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात बेशिस्तपणा वाढला असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे या मार्गावरून साधे चालणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

पांढरकवडातील बँकेत ग्राहकांची गर्दी

पांढरकवडा : शहरात बँकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीयीकृत बँका, नागरी संस्था, पतसंस्था, मल्टिस्टेट बँका या सर्वच ठिकाणी ग्राहक गर्दी करू लागले आहेत. परंतु, काही बँकेत ग्राहक मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे, आदी नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक बँकांमध्ये सॅनिटायझरची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

धोकादायक झाड तोडण्याची मागणी

वणी : वणी ते घोन्सा मार्गावरील मोहोर्ली गावाजवळ असलेले एक मोठे झाड रस्त्याच्या दिशेला झुकले आहे. त्यामुळे हे झाड केव्हा कोसळेल, याचा काही नेम उरलेला नाही. अनेकदा पाऊस आल्यास नागरिक याच झाडाखाली थांबतात. त्यामुळेही अपघाताचा धेाका बळावला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हे धोकादायक झाड तोडावे, अशी मागणी केली जात आहे.