शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

उमरखेड उपविभागाला कोट्यवधींचा फटका

By admin | Updated: March 9, 2016 00:11 IST

उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

गारपिटीचा तडाखा : शेतकऱ्यांच्या व्यथा थेट दिल्लीतउमरखेड : उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक गावात कृषी व महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा खासदार राजीव सातव यांनी थेट दिल्लीत मांडल्या आहे.गत आठवड्यात महागाव आणि उमरखेड या तालुक्यात प्रचंड गारपीट झाली. अनेक गावात शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. त्यात उमरखेड तालुक्यातील साखरा, दिघडी, देवसरी, चालगणी, टाकळी, राजापूर, तिवडी, बाळदी, सुकळी तसेच महागाव तालुक्यातील लेवा, हिवरा, करंजखेड, महागाव, सवना, अंबोडा, गुंज, अनंतवाडी, धनोडा, ईजनी, पोहंडूळ, धार, आमणी या गावात प्रचंड नुकसान झाले. आता आठवडा झाला तरी बहुतांश गावात कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी पोहोचले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही प्रशासन दखल घ्यायला तयार नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. लेवाच्या सरपंच माहेश्वरी खंदारे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.शेतीच्या नुकसानीसोबतच उमरखेड उपविभागातील घरे, जनावरे, धान्य, टीनपत्रे आदींचेही मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांच्या या भावना हिंगोलीचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी संसदेच्या अधिवेशनात शून्य प्रहरात उपस्थित केला. त्यांनी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. आता शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)