शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

उमरखेड उपविभागाला कोट्यवधींचा फटका

By admin | Updated: March 9, 2016 00:11 IST

उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

गारपिटीचा तडाखा : शेतकऱ्यांच्या व्यथा थेट दिल्लीतउमरखेड : उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक गावात कृषी व महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा खासदार राजीव सातव यांनी थेट दिल्लीत मांडल्या आहे.गत आठवड्यात महागाव आणि उमरखेड या तालुक्यात प्रचंड गारपीट झाली. अनेक गावात शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. त्यात उमरखेड तालुक्यातील साखरा, दिघडी, देवसरी, चालगणी, टाकळी, राजापूर, तिवडी, बाळदी, सुकळी तसेच महागाव तालुक्यातील लेवा, हिवरा, करंजखेड, महागाव, सवना, अंबोडा, गुंज, अनंतवाडी, धनोडा, ईजनी, पोहंडूळ, धार, आमणी या गावात प्रचंड नुकसान झाले. आता आठवडा झाला तरी बहुतांश गावात कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी पोहोचले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही प्रशासन दखल घ्यायला तयार नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. लेवाच्या सरपंच माहेश्वरी खंदारे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.शेतीच्या नुकसानीसोबतच उमरखेड उपविभागातील घरे, जनावरे, धान्य, टीनपत्रे आदींचेही मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांच्या या भावना हिंगोलीचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी संसदेच्या अधिवेशनात शून्य प्रहरात उपस्थित केला. त्यांनी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. आता शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)