शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कीड नियंत्रणासाठी क्रॉपसॅप प्रकल्प

By admin | Updated: June 15, 2015 02:28 IST

शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, भात, तूर व हरभरा या पिकांवरील किडरोगांच्या ...

दारव्हा : शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, भात, तूर व हरभरा या पिकांवरील किडरोगांच्या व्यवस्थापनासाठी कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राज्यात राबविण्याकरिता शासनाने सात कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.राज्यात गेल्या काही वर्षातील पावसाची अनियमितता, त्यामुळे पडाणारा खंड आणि त्यानुसार हवामानात होणारे चढउतार यामुळे पीकांवरील कीड आणि रोगांच्या वाढीकरिता अचानक निर्माण झालेल्या विशिष्ट अनुकूल परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मागील काही वर्षामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये प्रादुर्भाव होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.कापूस व सोयाबीन ही नगदी पिके, भात हे तृणधान्य वर्गीय पीक तसेच तूर व हरभरा ही कडधान्य वर्गीय पिके शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टीने महत्त्वाची आहेत. सदर पिकांवर उद्भवणाऱ्या किडरोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळता यावे यासाठी कृषी विभागामार्फत कापूस, सोयाबीन, भात, तूर व हरभरा पिकावरील किडरोगाच्या व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) आखण्यात आला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना किडरोग सर्वेक्षणाच्या आधारे करावयाच्या पीक संरक्षण उपाययोजना या बाबतचे संदेश देणे, शेतकऱ्यांमध्ये कीडरोगांची ओळख निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षित करून किडरोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे, कीड रोगांच्या प्रादुर्भावाबाबत जागरूकता निर्माण करणे व पुढील संभाव्य नुकसान एकूण उत्पादनात वाढ करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, भात व तूर पिकावरील व २९ जिल्ह्यांमध्ये हरभरा पिकावरील कीड रोगांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नवी दिल्ली, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, राष्ट्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद यासह इतर संस्थांच्या सहभागाने या हंगामात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)