शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पांढरकवडात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान, कापूस भिजू लागला : बोंडे सडू लागली, वाढही खुंटली, सोयाबीनला कोंब फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

शेतातून निघालेली कपाशी भिजू लागली आहे, तर अनेक ठिकाणी कपाशीचे बोंड सडण्याचे तसेच काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर काही ...

शेतातून निघालेली कपाशी भिजू लागली आहे, तर अनेक ठिकाणी कपाशीचे बोंड सडण्याचे तसेच काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचत असल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहात असल्याने व हवेतील आर्द्रतेमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यात यावर्षी सोयाबीन पिकाची व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सुरूवातीला पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत असताना पावसाने धडाका सुरू केला व अद्यापही वरूणराजाची अवकृपा सुरूच आहे. पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने चिंतेत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशीसह इतर पिके धोक्यात आली आहे. २३ सप्टेंबरला हिवाळ्याची सुरूवात झाली असली, तरी पाऊस दरदिवशीच बरसत असल्याने शेतातील कपाशीची बोंडे अनेक ठिकाणी सडून पडत आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटला असून, तो ओला होत आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहे. वातावरणात सतत आर्द्रता असल्याने रोगांचेही प्रमाण वाढू लागले आहे. या सर्व बाबींमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाच्या नजर पाहणीत सोयाबीन व कपाशीचेही नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सततच्या पावसाने नुकसान झाले आहे, त्यांच्याकडून शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. पुढील काही दिवस आणखी पाऊस पडला तर पिकांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे.

कोट : शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करावा. जेणेकरून पिकांची वाढ होईल व उघडीप मिळताच सोयाबीनची कापणी करून घ्यावी. तसेच रोगांसाठी बुरशीनाशकाचा वापर करावा, जेणेकरून पिकांचे नुकसान होणार नाही.

- आर. आर. दासरवार, तालुका कृषी अधिकारी, पांढरकवडा.

कोट : कपाशी फुटली असून, पावसाने भिजून जात आहे. सततच्या पावसाने बोंडं काळी पडली असून, शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आणखीन नुकसान होत आहे.

- प्रा. अजय सोळंके, प्रयोगशील शेतकरी, पांढरकवडा.