शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पांढरकवडात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान, कापूस भिजू लागला : बोंडे सडू लागली, वाढही खुंटली, सोयाबीनला कोंब फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

शेतातून निघालेली कपाशी भिजू लागली आहे, तर अनेक ठिकाणी कपाशीचे बोंड सडण्याचे तसेच काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर काही ...

शेतातून निघालेली कपाशी भिजू लागली आहे, तर अनेक ठिकाणी कपाशीचे बोंड सडण्याचे तसेच काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचत असल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहात असल्याने व हवेतील आर्द्रतेमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यात यावर्षी सोयाबीन पिकाची व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सुरूवातीला पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत असताना पावसाने धडाका सुरू केला व अद्यापही वरूणराजाची अवकृपा सुरूच आहे. पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने चिंतेत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशीसह इतर पिके धोक्यात आली आहे. २३ सप्टेंबरला हिवाळ्याची सुरूवात झाली असली, तरी पाऊस दरदिवशीच बरसत असल्याने शेतातील कपाशीची बोंडे अनेक ठिकाणी सडून पडत आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटला असून, तो ओला होत आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहे. वातावरणात सतत आर्द्रता असल्याने रोगांचेही प्रमाण वाढू लागले आहे. या सर्व बाबींमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाच्या नजर पाहणीत सोयाबीन व कपाशीचेही नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सततच्या पावसाने नुकसान झाले आहे, त्यांच्याकडून शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. पुढील काही दिवस आणखी पाऊस पडला तर पिकांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे.

कोट : शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करावा. जेणेकरून पिकांची वाढ होईल व उघडीप मिळताच सोयाबीनची कापणी करून घ्यावी. तसेच रोगांसाठी बुरशीनाशकाचा वापर करावा, जेणेकरून पिकांचे नुकसान होणार नाही.

- आर. आर. दासरवार, तालुका कृषी अधिकारी, पांढरकवडा.

कोट : कपाशी फुटली असून, पावसाने भिजून जात आहे. सततच्या पावसाने बोंडं काळी पडली असून, शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आणखीन नुकसान होत आहे.

- प्रा. अजय सोळंके, प्रयोगशील शेतकरी, पांढरकवडा.