शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५१ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात़, पांढरकवडा तालुका : दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

पुरेसा पाऊस येईल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे पाऊसच ...

पुरेसा पाऊस येईल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे पाऊसच नाही. त्यामुळे पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिके होरपळत आहेत. यावर्षी कपाशीपाठोपाठ सोयाबीनचा पेराही वाढला आहे. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी तब्बल ३८ हजार ३०४ हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. यावर्षी बियाणाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे मशागतीसाठी शेतकऱ्यांना भरपूर खर्च करावा लागला. त्यात मागील दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आधीच शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन आपल्या शेताची मशागत केली. खासगी सावकाराकडून पैसे घेतले, अनेकांनी उसनवारी करून बियाणे खरेदी केले. काहींनी तर घरचे दागिने गहाण ठेवून बियाणाची सोय केली. तसेच रासायनिक खते व इतर वस्तूंची खरेदी केली; परंतु महागडे बियाणे आता मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु पाऊस तर सोडाच चांगले कडाक्याचे ऊन तापत आहे. त्यामुळे पिकांनी माना खाली टाकल्या. हे चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आधीच शेतकऱ्यांनी उसनवारी करून खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन महागडे बियाणे खरेदी केले. परंतु हे बियाणे आता मातीमोल होत असल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी तरी कशी असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.