शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

५१ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात़, पांढरकवडा तालुका : दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

पुरेसा पाऊस येईल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे पाऊसच ...

पुरेसा पाऊस येईल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे पाऊसच नाही. त्यामुळे पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिके होरपळत आहेत. यावर्षी कपाशीपाठोपाठ सोयाबीनचा पेराही वाढला आहे. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी तब्बल ३८ हजार ३०४ हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. यावर्षी बियाणाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे मशागतीसाठी शेतकऱ्यांना भरपूर खर्च करावा लागला. त्यात मागील दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आधीच शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन आपल्या शेताची मशागत केली. खासगी सावकाराकडून पैसे घेतले, अनेकांनी उसनवारी करून बियाणे खरेदी केले. काहींनी तर घरचे दागिने गहाण ठेवून बियाणाची सोय केली. तसेच रासायनिक खते व इतर वस्तूंची खरेदी केली; परंतु महागडे बियाणे आता मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु पाऊस तर सोडाच चांगले कडाक्याचे ऊन तापत आहे. त्यामुळे पिकांनी माना खाली टाकल्या. हे चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आधीच शेतकऱ्यांनी उसनवारी करून खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन महागडे बियाणे खरेदी केले. परंतु हे बियाणे आता मातीमोल होत असल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी तरी कशी असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.