शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाशी निगडित पीक पद्धती काळाची गरज

By admin | Updated: May 9, 2016 02:26 IST

महाराष्ट्रात मुबलक पाऊस होतो. यानंतरही पावसाळा संपताच टँकरची मदत घ्यावी लागते. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.

यवतमाळ : महाराष्ट्रात मुबलक पाऊस होतो. यानंतरही पावसाळा संपताच टँकरची मदत घ्यावी लागते. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. मुळात राज्यात पाण्याच्या योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. पावसाशी निगडित पिकपध्दतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्र सिंग (राजस्थान) यांनी केले.लोकजागृती मंचच्यावतीने येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित जलसंवाद कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. माजीमंत्री वसंत पुरके, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर, जलव्यस्थापन वाल्मीचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, उपविभागीय अधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषद सदस्य तथा लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार आदींची मंचावर उपस्थिती होती.राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, राज्यस्थानातील सात नद्या जिवंत करण्यासाठी ३२ वर्षांचा कालखंड लागला. यानंतर या ठिकाणी पाणी पाहायला मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात पाणी टंचाईची तिव्रता काहीच नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष या बाबीला कारणीभूत आहे. आपल्याला नद्या जिवंत ठेवायच्या असतील तर, लहान नाले जिवंत करावे लागेल. त्या खेरीज बारमाही पाणी मिळनार नाही. देशभरातील पाण्याच्या संचयाच्या तुलनेत राज्यात ४० टक्के पाणी आहे. यानंतरही पाण्यासाठी भटकंती होते. शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करून पाण्याची साक्षरता राबविण्याची नितांत गरज आहे. तरच पुढील काळात चित्र बदलेल. त्यामुळे आजच सावध होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.सुरेश खानापूरकर म्हणाले, आज असलेले लातुरचे चित्र पुढे अनेक जिल्ह्यात दिसू शकते. महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यासोबत सुजलाम सुफलाम करण्यासाठी ३० हजार कोटी द्या, शिरपूर पॅटर्न राबवून चित्र बदलवून दाखविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज मोठ्या धरणाची नव्हे तर, छोट्या नाल्यांवर बांध घालण्याची आवश्यकता आहे. यामुळे पाणी रिचार्ज होवून पातळी वाढेल. सध्या पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. पाण्याचे पुनर्भरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर त्यांनी चिंता व्यक्त केली. माथा ते पायथा धोरण राबविल्यास क्रांती घडेल असे ते म्हणाले. संचालन कैलास राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक शैलेश इंगोले होते. या कार्यक्रमाला नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)