शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

राज्यात पावसाशी निगडित पीक पद्धती काळाची गरज

By admin | Updated: May 9, 2016 02:26 IST

महाराष्ट्रात मुबलक पाऊस होतो. यानंतरही पावसाळा संपताच टँकरची मदत घ्यावी लागते. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.

यवतमाळ : महाराष्ट्रात मुबलक पाऊस होतो. यानंतरही पावसाळा संपताच टँकरची मदत घ्यावी लागते. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. मुळात राज्यात पाण्याच्या योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. पावसाशी निगडित पिकपध्दतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्र सिंग (राजस्थान) यांनी केले.लोकजागृती मंचच्यावतीने येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित जलसंवाद कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. माजीमंत्री वसंत पुरके, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर, जलव्यस्थापन वाल्मीचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, उपविभागीय अधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषद सदस्य तथा लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार आदींची मंचावर उपस्थिती होती.राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, राज्यस्थानातील सात नद्या जिवंत करण्यासाठी ३२ वर्षांचा कालखंड लागला. यानंतर या ठिकाणी पाणी पाहायला मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात पाणी टंचाईची तिव्रता काहीच नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष या बाबीला कारणीभूत आहे. आपल्याला नद्या जिवंत ठेवायच्या असतील तर, लहान नाले जिवंत करावे लागेल. त्या खेरीज बारमाही पाणी मिळनार नाही. देशभरातील पाण्याच्या संचयाच्या तुलनेत राज्यात ४० टक्के पाणी आहे. यानंतरही पाण्यासाठी भटकंती होते. शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करून पाण्याची साक्षरता राबविण्याची नितांत गरज आहे. तरच पुढील काळात चित्र बदलेल. त्यामुळे आजच सावध होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.सुरेश खानापूरकर म्हणाले, आज असलेले लातुरचे चित्र पुढे अनेक जिल्ह्यात दिसू शकते. महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यासोबत सुजलाम सुफलाम करण्यासाठी ३० हजार कोटी द्या, शिरपूर पॅटर्न राबवून चित्र बदलवून दाखविल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज मोठ्या धरणाची नव्हे तर, छोट्या नाल्यांवर बांध घालण्याची आवश्यकता आहे. यामुळे पाणी रिचार्ज होवून पातळी वाढेल. सध्या पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. पाण्याचे पुनर्भरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर त्यांनी चिंता व्यक्त केली. माथा ते पायथा धोरण राबविल्यास क्रांती घडेल असे ते म्हणाले. संचालन कैलास राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक शैलेश इंगोले होते. या कार्यक्रमाला नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)