शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कोलवॉशरीच्या धुळीने पिके काळवंडली

By admin | Updated: January 26, 2017 01:07 IST

तालुक्यातील पुनवट येथील इंडो युनिक कोलवॉशरीमधून निघणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे शेतातील पिके काळवंडली आहे.

वणी : तालुक्यातील पुनवट येथील इंडो युनिक कोलवॉशरीमधून निघणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे शेतातील पिके काळवंडली आहे. त्यामुळे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रदूषणग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. तालुक्यातील पुनवट येथे इंडो युनिक नावाची कोलवॉशरी आहे. कंपनीने वॉशरीजवळ कोळशाचे मोठमोठे ढिगारे लावले आहे. त्याचबरोबर या कोलवॉशरीतून निघणारे कोळशाचे पाणी शेताच्या दिशेने सोडण्यात येत आहे. परिणामी पिकांची गुणवत्ता ढासळत आहे. या कोलवॉशरीच्या सभोवताल असलेल्या शेतात कापूस व इतर पिके घेण्यात आली आहेत. मात्र या वॉशरीतून निघणाऱ्या धूळ व पाण्यामुळे संपूर्ण पिके काळवंडली आहेत. रस्त्यावरही कोळशाची धूळ पसरली असून ती शेतातील पिकांवर पसरत आहे. मात्र कोलवॉशरीतर्फे रस्त्यावर पाण्याचे टँकरच फिरविण्यात येत नाही. ही कोलवॉशरी नियमांचे उल्लंघन करीत असून शेतकऱ्यांचे पीक नष्ट करीत आहे व कंपनी मात्र कोट्यावधी रूपये कमवित असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करून कृषी विभागामार्फत शेतीचा सर्व्हे करण्यात यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, प्रदूषणावर आळा बसवून दर महिन्याला गावात आरोग्य शिबिर घेण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात लुकेश्वर बोबडे, रामदास नागपूरे, रामदास डहाके, नारायण डहाके, दसरू झाडे, मधुकर बोबडे, कवडू झाडे, रत्नाकर झाडे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)