शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

उंबरठा उत्पादनावरच पीक विम्याचा लाभ

By admin | Updated: May 25, 2014 23:53 IST

जिल्ह्यात यावर्षी अतवृष्टी, परतीचा पाऊस आणि गारपिटीने अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडून दखल घेतली जाईल, अशी आशा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांना होती.

यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी अतवृष्टी, परतीचा पाऊस आणि गारपिटीने अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडून दखल घेतली जाईल, अशी आशा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने जाहीर केलेल्या पत्रात उंबरठा उत्पादनावर पीक विमा दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात यावर्षी तीन लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. याची दखल कृषी विभागामार्फत घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तोकडी मदत जाहीर केली. यामुळे शेतकरी हताश झाले होते. अशावेळी शेतकर्‍यांपुढे पीक विमा हाच आशेचा किरण होता. त्यामुळे शेतकरी पीक विमा आपल्या खात्यात जमा झाला का याची खात्री करण्यासाठी बँकाकडे येरझारा मारत आहेत. बँकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडेही धाव घेतली. यानंतरही शेतकर्‍यांना दिलासा न मिळाल्याने भीमराव राठोड या शेतकर्‍याने केंद्रीय कृषी सचिव आणि राज्य कृषी आयुक्तांकडे धाव घेतली.

विम्याची रक्कम द्या अथवा विम्याचा पैसा परत करा, अशा आशयाचे पत्र त्यांनी पाठविले. याची दखल घेत विमा कंपनीने पीक विमा उतरविण्याचे निकष जाहीर केले आहे. यामध्ये शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला असला तरी, त्यांचे उंबरठा उत्पादन कमी असल्यास शेतकरी पीक विम्याच्या मदतीस पात्र ठरतील, असे निकष असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गारपीट, अतवृष्टी झाल्यास ४८ तासांत याबाबतची सूचना आणि पंचनामा विमा कंपनीला सादर करणे गरजेचे होते, असेही म्हटले आहे. त्यामुळे किती शेतकरी मदतीस पात्र ठरतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा कंपनीने पीक प्रात्यक्षिक प्रयोगाच्या उंबरठा उत्पादन तपासण्याच्या प्रक्रि येला सुरुवात केली आहे, अशी माहिती अँग्रीकल्चरल इन्शूरन्स कंपनीचे सहव्यवस्थापक एम.एस. सावंत यांनी कळविली आहे. (शहर वार्ताहर )