यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी अतवृष्टी, परतीचा पाऊस आणि गारपिटीने अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडून दखल घेतली जाईल, अशी आशा विमा उतरविणार्या शेतकर्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने जाहीर केलेल्या पत्रात उंबरठा उत्पादनावर पीक विमा दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात यावर्षी तीन लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. याची दखल कृषी विभागामार्फत घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने तोकडी मदत जाहीर केली. यामुळे शेतकरी हताश झाले होते. अशावेळी शेतकर्यांपुढे पीक विमा हाच आशेचा किरण होता. त्यामुळे शेतकरी पीक विमा आपल्या खात्यात जमा झाला का याची खात्री करण्यासाठी बँकाकडे येरझारा मारत आहेत. बँकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेतकर्यांनी कृषी विभागाकडेही धाव घेतली. यानंतरही शेतकर्यांना दिलासा न मिळाल्याने भीमराव राठोड या शेतकर्याने केंद्रीय कृषी सचिव आणि राज्य कृषी आयुक्तांकडे धाव घेतली. विम्याची रक्कम द्या अथवा विम्याचा पैसा परत करा, अशा आशयाचे पत्र त्यांनी पाठविले. याची दखल घेत विमा कंपनीने पीक विमा उतरविण्याचे निकष जाहीर केले आहे. यामध्ये शेतकर्यांनी पीक विमा उतरविला असला तरी, त्यांचे उंबरठा उत्पादन कमी असल्यास शेतकरी पीक विम्याच्या मदतीस पात्र ठरतील, असे निकष असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गारपीट, अतवृष्टी झाल्यास ४८ तासांत याबाबतची सूचना आणि पंचनामा विमा कंपनीला सादर करणे गरजेचे होते, असेही म्हटले आहे. त्यामुळे किती शेतकरी मदतीस पात्र ठरतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमा कंपनीने पीक प्रात्यक्षिक प्रयोगाच्या उंबरठा उत्पादन तपासण्याच्या प्रक्रि येला सुरुवात केली आहे, अशी माहिती अँग्रीकल्चरल इन्शूरन्स कंपनीचे सहव्यवस्थापक एम.एस. सावंत यांनी कळविली आहे. (शहर वार्ताहर )
उंबरठा उत्पादनावरच पीक विम्याचा लाभ
By admin | Updated: May 25, 2014 23:53 IST