शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

पीक विमा अडला फाईलीत

By admin | Updated: August 8, 2014 00:12 IST

केंद्र आणि राज्य शासनाने पीक विम्यातील अनुदानाची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात अद्यपही वळती केली नाही. परिणामी पीक विम्याची मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे.

शेतकरी प्रतीक्षेत : केंद्र आणि राज्य शासनाने अनुदान दिलेच नाहीरूपेश उत्तरवार - यवतमाळ केंद्र आणि राज्य शासनाने पीक विम्यातील अनुदानाची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात अद्यपही वळती केली नाही. परिणामी पीक विम्याची मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे. अनुदानाची फाईल राज्य शासनाच्या अर्थ विभागात अडकल्याने जिल्ह्यातील ८९ हजार शेतकरी प्रतीक्षेत आहे.जिल्ह्यातील ८९ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. महिनाभरापूर्वी घोषणा झाली. शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली. शेतकरी दररोज जिल्हा आणि राष्ट्रीकृत बँकेत जाऊन विचारणा करीत आहेत. मात्र त्यांना रित्या हाताने परतावे लागत आहे. राज्यात ८४ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला ३४ कोटी ६८ लाख रूपयांची मदत आली आहे. दुबार आणि तिबार पेरणीच्या काळात बियाणे खरेदीसह खतासाठी पीक विम्याची रक्कम मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. राष्ट्रीय पीक विमा योजनेत पाच एकरा आतील शेतकऱ्यांना हेक्टरी विमा उतरवितांना ७० टक्के भार राज्य आणि केंद्र शासन उचलते. तर ३० टक्के विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भरायची असते. पाच एकरावरील शेतकऱ्यांना ५० टक्के विमा रक्कम भरायची आहे. तर ५० टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार होते. यातील शेतकऱ्यांनी आपला वाटा विमा उतरवितांना भरला. मात्र राज्य आणि केंद्र शासनाचा वाटा विमा कंपनीकडे वळताच झाला नाही. अनुदानाची ही रक्कम मिळावी म्हणून विमा कंपनीने अर्थ विभागाकडे फाईल सादर केले. मात्र या लेखा शिर्षावर अनुदानाचा पैसाच नाही. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही छदाम जमा केला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.