शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

शेती पिकांची वाढ खुंटली

By admin | Updated: August 14, 2014 00:07 IST

पावसाअभावी शेती पिकांची वाढ खुंटल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत सापडले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने आर्थिक संकटात

वणी : पावसाअभावी शेती पिकांची वाढ खुंटल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत सापडले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आता दुष्काळाच्या धास्तीने पुरते हादरून गेले आहे. तथापि शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.मारेगाव - पिके जोमाने वाढण्याच्या काळातच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़यावर्षी पावसाळ्याला उशिरा सुरूवात झाली़ त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा का होईना कशीबशी पेरणी आटोपली़ यात काहींनी दुबार, तिबार पेरणी केली़ त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले़ जुलै महिन्यात दोन आठवडे बऱ्यापैकी पाऊस पडला़ पिकांची खुंटलेली वाढ भरून काढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खताचे डोस दिले़ परंतु खतांचे डोस देताच पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांची अवस्था आता नाजूक झाली आहे. अल्प पाऊस, पिकांची खुंटलेली वाढ आणि खतांचा मिळालेला डोस, यामुळे पिकांची वाढ होण्यापेक्षा पिके आता पावसाअभावी सुकू लागली आहेत़ तालुक्यातील नवरगाव, बोटोणी, वेगाव मारेगाव या मंडळात पिकांची स्थिती अतिशय नाजूक आहे़ या भागात गेल्या दोन महिन्यात अतिशय अल्प पाऊस झाला़ त्यामुळे बियाणे कसेबसे अंकुरले, मात्र पिकांमध्ये जोम नाही़ त्यातच गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. महसूल प्रशासनाने या भागातील पिकांचे पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे़ अन्यथा या परिसरातील शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. पांढरकवडा - कोरडा व ओल्या दुष्काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून नापिकीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांवर यावर्षीही अत्यल्प पावसामुळे पुन्हा दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे़ निम्माअधिक पावसाळा संपूनही पावसाने दमदार हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना अल्प प्रमाणातील पावसामुळे दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागला. दुबार पेरणीनंतर पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र आॅगस्टचा दुसरा आठवडा संपत आला असूनही पावसाने दमदार हजेरी न लावल्याने अनेक शेतात बियाणे उगवलेच नाही़ मध्यंतरी अल्पशा पावसाच्या भरवशावर काही ठिकाणी बियाणे अुंकरले. मात्र तेही आता सुकू लागले आहे. अनेक ठिकाणी पिके अजूनही जमिनीबाहेर निघत आहे़ कशाबशा पाण्याची सोय करत जगवलेल्या कपाशीलाही योग्य वातावरण व नंतर आवश्यकतेनुसार पुरेसा पाणी मिळत नसल्याने रोगरोईची मालिका सुरू झाली आहे़ नापिकीमुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी पुन्हा कर्ज काढून दाग-दागिने गहाण ठेवून किंवा विकून शेतात पेरणी केली़ मात्र पावसाअभावी मातीत टाकलेले लाखो रूपये मातीतच जाण्याची वेळ आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़ काहींची अंकुरलेली पिकेही आता सुकू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे़ तालुक्यातील खुनी, पैनगंगा व इतर छोट्या-मोठ्या नद्या, नाले कोरडे झाले आहे़ सायखेडा धरणातही मर्यादित पाणी आहे़ पिण्याचे पाणी, चाऱ्याची टंचाई, नापिकीची तिव्रता जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत आहे. राजकीय मंडळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत मश्गूल आहे़ दुष्काळाची छाया गडद होत असताना प्रशासन स्तरावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे़ (प्रतिनिधी)