शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेती पिकांची वाढ खुंटली

By admin | Updated: August 14, 2014 00:07 IST

पावसाअभावी शेती पिकांची वाढ खुंटल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत सापडले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने आर्थिक संकटात

वणी : पावसाअभावी शेती पिकांची वाढ खुंटल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत सापडले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आता दुष्काळाच्या धास्तीने पुरते हादरून गेले आहे. तथापि शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.मारेगाव - पिके जोमाने वाढण्याच्या काळातच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़यावर्षी पावसाळ्याला उशिरा सुरूवात झाली़ त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा का होईना कशीबशी पेरणी आटोपली़ यात काहींनी दुबार, तिबार पेरणी केली़ त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले़ जुलै महिन्यात दोन आठवडे बऱ्यापैकी पाऊस पडला़ पिकांची खुंटलेली वाढ भरून काढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खताचे डोस दिले़ परंतु खतांचे डोस देताच पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांची अवस्था आता नाजूक झाली आहे. अल्प पाऊस, पिकांची खुंटलेली वाढ आणि खतांचा मिळालेला डोस, यामुळे पिकांची वाढ होण्यापेक्षा पिके आता पावसाअभावी सुकू लागली आहेत़ तालुक्यातील नवरगाव, बोटोणी, वेगाव मारेगाव या मंडळात पिकांची स्थिती अतिशय नाजूक आहे़ या भागात गेल्या दोन महिन्यात अतिशय अल्प पाऊस झाला़ त्यामुळे बियाणे कसेबसे अंकुरले, मात्र पिकांमध्ये जोम नाही़ त्यातच गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. महसूल प्रशासनाने या भागातील पिकांचे पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे़ अन्यथा या परिसरातील शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. पांढरकवडा - कोरडा व ओल्या दुष्काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून नापिकीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांवर यावर्षीही अत्यल्प पावसामुळे पुन्हा दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे़ निम्माअधिक पावसाळा संपूनही पावसाने दमदार हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना अल्प प्रमाणातील पावसामुळे दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागला. दुबार पेरणीनंतर पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र आॅगस्टचा दुसरा आठवडा संपत आला असूनही पावसाने दमदार हजेरी न लावल्याने अनेक शेतात बियाणे उगवलेच नाही़ मध्यंतरी अल्पशा पावसाच्या भरवशावर काही ठिकाणी बियाणे अुंकरले. मात्र तेही आता सुकू लागले आहे. अनेक ठिकाणी पिके अजूनही जमिनीबाहेर निघत आहे़ कशाबशा पाण्याची सोय करत जगवलेल्या कपाशीलाही योग्य वातावरण व नंतर आवश्यकतेनुसार पुरेसा पाणी मिळत नसल्याने रोगरोईची मालिका सुरू झाली आहे़ नापिकीमुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी पुन्हा कर्ज काढून दाग-दागिने गहाण ठेवून किंवा विकून शेतात पेरणी केली़ मात्र पावसाअभावी मातीत टाकलेले लाखो रूपये मातीतच जाण्याची वेळ आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे़ काहींची अंकुरलेली पिकेही आता सुकू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे़ तालुक्यातील खुनी, पैनगंगा व इतर छोट्या-मोठ्या नद्या, नाले कोरडे झाले आहे़ सायखेडा धरणातही मर्यादित पाणी आहे़ पिण्याचे पाणी, चाऱ्याची टंचाई, नापिकीची तिव्रता जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत आहे. राजकीय मंडळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत मश्गूल आहे़ दुष्काळाची छाया गडद होत असताना प्रशासन स्तरावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे़ (प्रतिनिधी)