शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

पीक आणेवारी फेरमूल्यांकन

By admin | Updated: November 20, 2015 02:42 IST

जिल्ह्यातील पीक आणेवारी जाहीर करण्यात आली. यात केवळ आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती दाखविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत ठराव : आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी धोरण ठरविणार यवतमाळ : जिल्ह्यातील पीक आणेवारी जाहीर करण्यात आली. यात केवळ आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती दाखविण्यात आली आहे. उर्वरित आठ तालुक्यात मात्र आणेवारी ५० पैशाच्यावर दाखविली आहे. या पीक आणेवारीचे फेरमूल्यांकन केले जावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीने गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत घेतला. शिवाय जिल्हा परिषदेच्या विविध योजना एकत्रित (कन्व्हर्जन) करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देता येईल का याचे धोरण ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आली. पीक आणेवारीत नेर, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, बाभूळगाव, यवतमाळ, कळंब या तालुक्यात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखविण्यात आली. तर वणी, झरी, मारेगाव, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, पुसद येथील पीक स्थिती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात ३० आॅक्टोबरला जिल्हा स्तरीय तपासणी समितीने घाटंजी तालुक्यातील पार्डी, कुऱ्हाड, पांढुर्णा, ससानी, आमडी या गावांमध्ये पीक पाहणी करून ८० ते ९० टक्के पीक बुडाल्याचा अहवाल दिला. या समितीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अशा पाच तज्ज्ञांचा समावेश असतो. त्यांनी ८० ते ९० टक्के पीक बुडाल्याचा अहवाल ३ नोव्हेंबरला दिला. मात्र याच तालुक्यातील पीक आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त दाखविण्यात आली. त्यामुळे आणेवारी राजकीय दबावातून जाहीर झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केला. शासनाच्या दोन यंत्रणा इतक्या भिन्न पद्धतीने अहवाल देतात हे अतिशय चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. समितीने आणेवारीच्या फेरमूल्यांकनाचा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवानंद पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. यावरून शेतकऱ्यांंना जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या विविध योजना आणि सेस फंडातील निधीतून काही मदत करता येते का याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. यात मुख्य लेखा अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांंचा समावेश आहे. यानंतर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसंदर्भातही चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या दुकानांचे भाडे वाढविण्यासाठी वकिलाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्यानंतर अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम १ यांच्या समितीकडे जबाबदारी सोपविली असून वसुली करणे, नव्याने भाडे करार केले जाणार आहे. स्थायी समितीमध्ये पदभरती प्रक्रियेत वेबसाईडवर अर्ज अपलोड होत नसल्याचा मुद्दाही चांगलाच गाजला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, समितीचे सर्व सदस्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)