शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

दारव्हात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : पावसाअभावी पिके करपली, निकृष्ट बियाण्यांचाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात तुरळक वगळता दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके कोमेजण्याची, करपण्याची शक्यता बळावली. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली. यावर्षी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्याच्या बातम्या आल्या. जून उजाडल्यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. वातावरण निर्मिती झाल्याने मृग नक्षत्राला प्रारंभ होताच पेरणीला सुरुवात करण्यात आली.तालुक्यात ३१ हजार २५० हेक्टरवर कपाशी, २५ हजार ३०० हेक्टरवर सोयाबीन, आठ हजार ५०० हेक्टरवर तूर लागवडीचा अंदाज आहे. या प्रमुख पिकासह एकूण ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड करण्यात आली. परंतु आठवडा उलटून गेला तरी पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांनी जमिनीतच दम तोडला. उगवलेल्या कोंबांना पाणी मिळाले, त्यांनी तग धरला. मात्र पाण्याअभावी इतर पिके करपत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.यावर्षी कोरोनामुळे आधीच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रथम शेतमाल विक्रीची समस्या निर्माण झाली. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर अनेकांचा नंबर लागला नाही. चुकारे उशीरा मिळाले. तसेच कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण आली. या सर्व संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी तजवीज करुन पेरणी केली. आता आसमानी संकट उभे राहिले. जून महिना संपत आला तरी एकही सार्वत्रिक व दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अंकुरलेले बियाणेही करपत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहे.मदतीची अपेक्षापावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास कोरडवाहू क्षेत्रातील सर्वच पेरण्या उलटण्याची भीती आहे. त्यामुळे असमानी, सुलतानी संकटांचे वार झेलणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेती