शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : पावसाअभावी पिके करपली, निकृष्ट बियाण्यांचाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात तुरळक वगळता दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके कोमेजण्याची, करपण्याची शक्यता बळावली. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली. यावर्षी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्याच्या बातम्या आल्या. जून उजाडल्यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. वातावरण निर्मिती झाल्याने मृग नक्षत्राला प्रारंभ होताच पेरणीला सुरुवात करण्यात आली.तालुक्यात ३१ हजार २५० हेक्टरवर कपाशी, २५ हजार ३०० हेक्टरवर सोयाबीन, आठ हजार ५०० हेक्टरवर तूर लागवडीचा अंदाज आहे. या प्रमुख पिकासह एकूण ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड करण्यात आली. परंतु आठवडा उलटून गेला तरी पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांनी जमिनीतच दम तोडला. उगवलेल्या कोंबांना पाणी मिळाले, त्यांनी तग धरला. मात्र पाण्याअभावी इतर पिके करपत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.यावर्षी कोरोनामुळे आधीच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रथम शेतमाल विक्रीची समस्या निर्माण झाली. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर अनेकांचा नंबर लागला नाही. चुकारे उशीरा मिळाले. तसेच कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण आली. या सर्व संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी तजवीज करुन पेरणी केली. आता आसमानी संकट उभे राहिले. जून महिना संपत आला तरी एकही सार्वत्रिक व दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अंकुरलेले बियाणेही करपत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहे.मदतीची अपेक्षापावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास कोरडवाहू क्षेत्रातील सर्वच पेरण्या उलटण्याची भीती आहे. त्यामुळे असमानी, सुलतानी संकटांचे वार झेलणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेती