शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

दारव्हात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : पावसाअभावी पिके करपली, निकृष्ट बियाण्यांचाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात तुरळक वगळता दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके कोमेजण्याची, करपण्याची शक्यता बळावली. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली. यावर्षी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्याच्या बातम्या आल्या. जून उजाडल्यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. वातावरण निर्मिती झाल्याने मृग नक्षत्राला प्रारंभ होताच पेरणीला सुरुवात करण्यात आली.तालुक्यात ३१ हजार २५० हेक्टरवर कपाशी, २५ हजार ३०० हेक्टरवर सोयाबीन, आठ हजार ५०० हेक्टरवर तूर लागवडीचा अंदाज आहे. या प्रमुख पिकासह एकूण ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड करण्यात आली. परंतु आठवडा उलटून गेला तरी पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांनी जमिनीतच दम तोडला. उगवलेल्या कोंबांना पाणी मिळाले, त्यांनी तग धरला. मात्र पाण्याअभावी इतर पिके करपत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.यावर्षी कोरोनामुळे आधीच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रथम शेतमाल विक्रीची समस्या निर्माण झाली. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर अनेकांचा नंबर लागला नाही. चुकारे उशीरा मिळाले. तसेच कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण आली. या सर्व संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी तजवीज करुन पेरणी केली. आता आसमानी संकट उभे राहिले. जून महिना संपत आला तरी एकही सार्वत्रिक व दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अंकुरलेले बियाणेही करपत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहे.मदतीची अपेक्षापावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास कोरडवाहू क्षेत्रातील सर्वच पेरण्या उलटण्याची भीती आहे. त्यामुळे असमानी, सुलतानी संकटांचे वार झेलणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेती