शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: July 12, 2014 01:49 IST

शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उमरखेड(कुपटी) : शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील खरूस येथील शेतकऱ्यांकडून दहा लाख ३५ हजार रुपयांचे धान्य खरेदी करण्यात आले होते. या प्रकाराने व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली. सागर सुभाष बदलवा, सुभाष गोपीलाल बदलवा, सत्यनारायण बालाप्रसाद दरक, आशिष सत्यनारायण दरक रा. आष्टी, ता. हदगाव, जि. नांदेड, रमेश रघुनाथ वानखडे, बालाजी राघोजी सूर्यवंशी रा. खरूस असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उमरखेड तालुक्यातील खरूस बु. येथील शेतकरी मारोतराव वानखेडे, प्रकाश वानखडे, उत्तमराव पाटील यांनी हरभरा व्यापारी सागर बदलवा यांना दिला. सदर व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक आहे. गावातच खरेदी केल्यानंतर काटा पावती आणि मालाच्या किमतीचीही पावती दिली. परंतु रोख पैसे दिले नाही. चार दिवसानंतर पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. एक महिना झाला तरी पैसे मिळत नसल्याचे आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी १२ जून रोजी उमरखेड पोलीस ठाणे आणि उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत तक्रार दिली. या तक्रारीवरून बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने बाजार समितीचे कृषी निरीक्षक आ.द. जगताप यांची याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. चौकशीअंती ५ जुलैला अहवाल दिला. या अहवालात सागर बदलवा हे बाजार समितीचे परवानाधारक खरीददार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांनी १ आॅक्टोबर २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ९६० क्विंटल सोयाबीन व १४० क्विंटल हरभरा खरेदी केल्याचे पुढे आले. मारोतराव वानखडे यांचे ७ लाख ८२ हजार, उत्तमराव पाटील यांचे ५७ हजार २२४, प्रकाश वानखडे यांचे ४९ हजार २०२ रुपये, प्रकाश आबाजी वानखडे यांचे १ लाख ४६ हजार ४७० असा एकूण १० लाख ३५ हजार ८१८ रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले. याप्रकरणी बाजार समितीचे सचिव अशोक कनवाळे यांच्या तक्रारीवरून सहा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)