शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: July 12, 2014 01:49 IST

शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उमरखेड(कुपटी) : शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील खरूस येथील शेतकऱ्यांकडून दहा लाख ३५ हजार रुपयांचे धान्य खरेदी करण्यात आले होते. या प्रकाराने व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली. सागर सुभाष बदलवा, सुभाष गोपीलाल बदलवा, सत्यनारायण बालाप्रसाद दरक, आशिष सत्यनारायण दरक रा. आष्टी, ता. हदगाव, जि. नांदेड, रमेश रघुनाथ वानखडे, बालाजी राघोजी सूर्यवंशी रा. खरूस असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उमरखेड तालुक्यातील खरूस बु. येथील शेतकरी मारोतराव वानखेडे, प्रकाश वानखडे, उत्तमराव पाटील यांनी हरभरा व्यापारी सागर बदलवा यांना दिला. सदर व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक आहे. गावातच खरेदी केल्यानंतर काटा पावती आणि मालाच्या किमतीचीही पावती दिली. परंतु रोख पैसे दिले नाही. चार दिवसानंतर पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. एक महिना झाला तरी पैसे मिळत नसल्याचे आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी १२ जून रोजी उमरखेड पोलीस ठाणे आणि उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत तक्रार दिली. या तक्रारीवरून बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने बाजार समितीचे कृषी निरीक्षक आ.द. जगताप यांची याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. चौकशीअंती ५ जुलैला अहवाल दिला. या अहवालात सागर बदलवा हे बाजार समितीचे परवानाधारक खरीददार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांनी १ आॅक्टोबर २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ९६० क्विंटल सोयाबीन व १४० क्विंटल हरभरा खरेदी केल्याचे पुढे आले. मारोतराव वानखडे यांचे ७ लाख ८२ हजार, उत्तमराव पाटील यांचे ५७ हजार २२४, प्रकाश वानखडे यांचे ४९ हजार २०२ रुपये, प्रकाश आबाजी वानखडे यांचे १ लाख ४६ हजार ४७० असा एकूण १० लाख ३५ हजार ८१८ रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले. याप्रकरणी बाजार समितीचे सचिव अशोक कनवाळे यांच्या तक्रारीवरून सहा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)