शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

एक हजार गावांतील अंत्यविधी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 21:37 IST

जिल्ह्यातील एक हजार गावांमध्ये स्मशानभूमीत शेड नाही. पर्यायाने तेथे मृतदेह उघड्यावर जाळावा लागतो. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार शेड अभावी पुढे ढकलण्याची वेळ येते.

ठळक मुद्दे‘डीपीसी’चा ठराव : जनसुविधेचे १३ कोटी ग्रामपंचायत इमारतींसाठी वळविले

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील एक हजार गावांमध्ये स्मशानभूमीत शेड नाही. पर्यायाने तेथे मृतदेह उघड्यावर जाळावा लागतो. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार शेड अभावी पुढे ढकलण्याची वेळ येते. अशी स्थिती असताना जिल्हा नियोजन समितीने या एक हजार गावांना स्मशान शेडसाठी प्रतीक्षा यादीत ठेवले आहे. त्याऐवजी ग्रामपंचायतींच्या इमारतींना प्राधान्य दिले जात आहे. जनसुविधेचा १३ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायत वास्तू निर्माणासाठी वळविण्यात आला आहे.जिल्ह्यातील एक हजार गावांना आजही स्मशान शेड नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांकडून या शेडची मागणी केली जात आहे. परंतु प्रत्येक वेळी निधीची अडचण निर्माण होते. जिल्ह्यातील अर्धी गावे शेडविना आहेत. यावर्षीसुद्धा सन २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी ४१८ गावांमध्ये स्मशान शेड, स्मशानभूमीतील रस्ता, पाणी, वॉल कंपाऊंड यासाठी प्रस्ताव दिले होते. त्याचे बजेट ५९ कोटी ७७ लाखांचे होते. स्मशानभूमी शेड व ग्रामपंचायत भवन निर्मितीसाठी जनसुविधेचा निधी वापरण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. परंतु जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्मशान शेड व तेथील अन्य सोई-सुविधांचा मुद्दा बाजूला ठेवला गेला. त्याऐवजी ग्रामपंचायत इमारतींना प्राधान्य दिले गेले. जिल्ह्यात २५९ ग्रामपंचायतींना इमारती नाही. त्यामुळे स्मशानभूमी विकासाचे १३ कोटी रुपये ग्रामपंचायतींसाठी वळविण्यात आले असून त्यातून ११२ ग्रामपंचायत भवन उभे राहणार आहे. तसा ठराव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला इमारत बांधकामासाठी १२ लाख रुपये मिळणार आहे. ‘डीपीसी’मधून स्मशानभूमी शेडसाठी निधी न देण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जाते. ग्रामपंचायत भवनासाठी रोहयोमधून निधी मिळविण्याचा पर्याय आहे. मात्र स्मशानभूमी शेडसाठी जनसुविधा हा एकमेव निधीचा मार्ग आहे. शासनाचा डीजिटलायझेशनवर जोर आहे. विविध प्रमाणपत्र ग्रामपंचायतींमधूनच मिळणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत भवनावर भर दिला जात आहे. लोकप्रतिनिधींनीच ग्रामपंचायत इमारत बांधकामाची मागणी केल्याचे ‘डीपीसी’कडून सांगितले जात आहे. १३ कोटी वळविल्याने स्मशानभूमी विकासासाठी आणखी काही वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. पर्यायाने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ एक हजार गावांतील नागरिकांवर कायम आहे. अंत्यविधी कुठे करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसारच ग्रामपंचायत इमारतींसाठी निधी देण्यात आला आहे. स्मशानभूमी विकासाकरिता गेल्या दोन वर्षात २४ कोटी रुपये दिले असून एवढा निधी कुणीच दिला नव्हता. लोकप्रतिनिधींनी पुढे मागणी केल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल.- मदन येरावारपालकमंत्री, तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती, यवतमाळजिल्हा नियोजन समितीमध्ये आमचे २४ सदस्य आहेत. मात्र त्यांच्या मागण्या व म्हणणे गृहित धरले जात नाही. सदस्यांनी सुचविलेल्या मागण्या स्वीकारल्याही जात नाही. आमच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. हा जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्र्रकार आहे. प्राधान्य कशाला द्यावे ? स्मशानभूमी विकासाला की ग्रामपंचायत इमारतींना याचे आत्मचिंतन व फेरविचार होणे गरजेचे आहे. एक हजार गावात आजही अंत्यसंस्कारासाठी पाऊस थांबविण्याची प्रतीक्षा करावी लागते. आता नाईलाजाने स्मशानशेडसाठी आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ जिल्हा परिषद सदस्यांवर आली आहे.- निमीष मानकरसभापती, बांधकाम जि.प.यवतमाळ