शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अध्यादेश रद्दसाठी भाकपचा मोर्चा

By admin | Updated: May 16, 2015 00:18 IST

केंद्र शासनाने भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुरूवारी मोर्चा ...

वणी : केंद्र शासनाने भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुरूवारी मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. केंद्र शासनाने ३१ मार्चला भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला आहे. त्यापूर्वी १८९४ मध्ये ब्रिटिशांनी भूसंपादनाचा कायदा करून देशातील शेतकऱ्यांवर अन्याय केला होता. त्यामुळे सन २०१३ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने भूसंपादन पुनर्वसनाचा कायदा बदलविला होता. त्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. मात्र नरेंद्र मोदी सत्तेवर येताच त्यांनी प्रथम कॉपोर्रेट लॉबी व बिल्डर्सना जमिनी सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सन २०१३ चा कायदा बदलून अध्यादेश काढला, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.लोकसभेत बहुमतामुळे हा अध्यादेश मंजूर झाला. तथापि राज्यसभेत केंद्र सरकारचे बहुमत नसल्याने डिसेंबर २०१४ चा अध्यादेश संपुष्टात येणार होता. त्यामुळे ३१ मार्च २०१५ रोजी केंद्र सरकारने नव्याने अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. परदेशी आणि देशी कॉपोर्रेट कंपन्या, भूमाफिया, बिल्डर, दलाल हे बागायती, दुबार पिकांच्या पाण्याखालील जमिनी बळकावरणार आहेत. हा अन्न सुरक्षेला धोका असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. २०१३ मधील भूसंपादन कायद्याने शेतकऱ्याच्या हिताच्या केलेल्या सर्व तरतुदी यानवीन अध्यादेशात काढून टाकण्यात आल्या आहेत. नवीन अध्यादेशात ८० टक्के शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन करता येणार नाही, ही अट काढून टाकण्यात आली आहे. मोदी सरकार २८ इंडस्ट्रियल कॉरिडॉर निर्माण करणार आहे. त्यामध्ये देशातील एकूण पिकाऊ जमिनीपैकी ३५ टक्के जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यात हजारो गावे गायब होण्याची भिती आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप शासन व महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना शासनाने हा अध्यादेश ताबडतोब परत घेऊन लॅड अ‍ॅक्विझिशन अ‍ॅन्ड रिसेटलमेंट अ‍ॅक्ट २०१३ चा कायदा अंमलबजावणीत आणावा, अशी मागणी अनिल घाटे, दिलीप परचाके, बंडू गोलर, धनंजय आंबटकर, दशरथ येनगंटीवार, ऋषी उलमाले, नमिता पाटील व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)