शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
2
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
5
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
6
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
7
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
8
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
9
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
10
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
11
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
12
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
13
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
14
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
15
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
18
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
19
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
20
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?

भूसंपादन अध्यादेश रद्दसाठी भाकपचा मोर्चा

By admin | Updated: May 16, 2015 00:18 IST

केंद्र शासनाने भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुरूवारी मोर्चा ...

वणी : केंद्र शासनाने भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुरूवारी मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. केंद्र शासनाने ३१ मार्चला भूमी अधिग्रहण अध्यादेश काढला आहे. त्यापूर्वी १८९४ मध्ये ब्रिटिशांनी भूसंपादनाचा कायदा करून देशातील शेतकऱ्यांवर अन्याय केला होता. त्यामुळे सन २०१३ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने भूसंपादन पुनर्वसनाचा कायदा बदलविला होता. त्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. मात्र नरेंद्र मोदी सत्तेवर येताच त्यांनी प्रथम कॉपोर्रेट लॉबी व बिल्डर्सना जमिनी सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सन २०१३ चा कायदा बदलून अध्यादेश काढला, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.लोकसभेत बहुमतामुळे हा अध्यादेश मंजूर झाला. तथापि राज्यसभेत केंद्र सरकारचे बहुमत नसल्याने डिसेंबर २०१४ चा अध्यादेश संपुष्टात येणार होता. त्यामुळे ३१ मार्च २०१५ रोजी केंद्र सरकारने नव्याने अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. परदेशी आणि देशी कॉपोर्रेट कंपन्या, भूमाफिया, बिल्डर, दलाल हे बागायती, दुबार पिकांच्या पाण्याखालील जमिनी बळकावरणार आहेत. हा अन्न सुरक्षेला धोका असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. २०१३ मधील भूसंपादन कायद्याने शेतकऱ्याच्या हिताच्या केलेल्या सर्व तरतुदी यानवीन अध्यादेशात काढून टाकण्यात आल्या आहेत. नवीन अध्यादेशात ८० टक्के शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन करता येणार नाही, ही अट काढून टाकण्यात आली आहे. मोदी सरकार २८ इंडस्ट्रियल कॉरिडॉर निर्माण करणार आहे. त्यामध्ये देशातील एकूण पिकाऊ जमिनीपैकी ३५ टक्के जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यात हजारो गावे गायब होण्याची भिती आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप शासन व महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना शासनाने हा अध्यादेश ताबडतोब परत घेऊन लॅड अ‍ॅक्विझिशन अ‍ॅन्ड रिसेटलमेंट अ‍ॅक्ट २०१३ चा कायदा अंमलबजावणीत आणावा, अशी मागणी अनिल घाटे, दिलीप परचाके, बंडू गोलर, धनंजय आंबटकर, दशरथ येनगंटीवार, ऋषी उलमाले, नमिता पाटील व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)