शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

कोर्टकचेरीने जिल्हा परिषद प्रशासन त्रस्त

By admin | Updated: July 10, 2015 02:18 IST

जिल्हा परिषद प्रशासनाची सर्वाधिक एनर्जी कोर्टकचेरीत खर्च होत आहे. पदोन्नती, बदल्यात अन्याय झाल्याच्या भावनेतून अनेक कर्मचाऱ्यांनी

भानगडी : तारीख-पेशीत होतेय एनर्जी वेस्ट यवतमाळ : जिल्हा परिषद प्रशासनाची सर्वाधिक एनर्जी कोर्टकचेरीत खर्च होत आहे. पदोन्नती, बदल्यात अन्याय झाल्याच्या भावनेतून अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये आरोग्य आणि शिक्षण विभागातील सर्वाधिक केसेस आहेत. यामध्ये प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. ही प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. आरोग्य विभागातील ४५ तर शिक्षण विभागातील ३३ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये औद्योगिक न्यायालय, आयुक्त आणि उच्च न्यायालयातील प्रकरणांचा समावेश आहे. या दोन विभागानंतर पंचायत विभागाचा क्रमांक लागतो. या तीन विभागांची कर्मचारी संख्या अधिक आहे. त्यामुळे येथेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीची प्रकरणे रेंगाळतात. मुख्यालय आणि सोयीच्या जागा मिळविण्यासाठी अनेकांना डावलून ही कार्यवाही केली जाते. यातून कर्मचाऱ्यांमध्ये हक्क हिरावल्याची भावना निर्माण होते. हिच संधी साधून मग त्यांना कायदेशीर सल्ला देणारे अनेक महाभाग आहेत. विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अनियमिततेमुळे आयतीच संधी या महागभागांना मिळते. यातूनच कोर्टकचेरीच्या येरझारा सुरू होतात. कर्मचारीसुद्धा कामात लक्ष द्यायचे सोडून आपला हक्क मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाईस तयार होतो. आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्यावर दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया होऊनही त्याला विनंती बदलीचा लाभ देण्यात आला नाही. मात्र, त्याच वेळी नव्यानेच रूज झालेल्या कर्मचाऱ्याना अंशत: बदलीचा लाभ कोणत्याही परिश्रमाशिवाय देण्यात आला. हाच दुजाभाव कर्मचाऱ्यांना न्यायालयात जाण्यास बाध्य करतो. अशी अनेक प्रकरणे शिक्षण आणि आरोग्य विभागात आहेत. त्यामुळेच रोजच जिल्हा परिषदेत कोणत्या ना कोणत्या न्यायालयाचा समन्स, वॉरंट धडकत आहे. असा समन्स आल्यानंतर तो घेण्यासाठी वरिष्ठांकडूनसुद्धा टोलवाटोलवी केली जाते. (कार्यालय प्रतिनिधी) गतिमान प्रशासनाला वाळवीएकाच विभागातील ४५ प्रकरणे असूनसुद्धा त्याबाबत कोणतीच कठोर भूमिका जिल्हा परिषद सीईओंकडून घेतली जात नाही. एकीकडे गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने प्रयत्नरत असताना ही वाळवी दूर करून कर्मचाऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास दृढ करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाही. कर्मचाऱ्यांसोबतच प्रशासन न्यायालयीन खटल्यामध्ये गुंतल्यानंतर गती कशी वाढणार? ही साधी बाब येथील अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही. अनेक कर्मचारी हे प्रशासनाविरोधात जाण्याच्या मानसिकतेत नसतात. मात्र, त्यांच्यावर खरोखरच अन्याय होत असूनही वरिष्ठ अधिकारी त्यात कोणतीच भूमिका घेत नसल्याने अनेकांचा नाईलाज झाला आहे.