शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

कर्तृत्वाचा गौरवच होईल

By admin | Updated: July 13, 2015 00:15 IST

शासकीय सेवेत काम करताना प्रामाणिकपणे ग्रामीण भागातील जनतेची, शेतकऱ्यांनी कामे करा. चांगले काम करणाऱ्यांचा यथोचित ...

जिल्हाधिकारी : राळेगाव येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळाराळेगाव : शासकीय सेवेत काम करताना प्रामाणिकपणे ग्रामीण भागातील जनतेची, शेतकऱ्यांनी कामे करा. चांगले काम करणाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात येईल. मात्र चुकीचे काम करणाऱ्यांना वठणीवर आणले जाईल, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले. राळेगाव उपविभागातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा येथे शनिवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह राळेगाव व कळंब तालुक्यातील तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक जीवनात वावरताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आचरण आदर्श असावे असे जिल्हाधिकारी म्हणाले. विविध शासकीय योजना प्रथम पूर्णपणे समजून घ्या. त्याची माहिती शेतकरी, मजुरांना घरोघरी जाऊन द्या. शासनाच्या विविध योजनात ग्रामपातळीवर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याचे चित्र बदलविण्याचे आव्हान स्वीकारा असे त्यांनी सांगितले. जनेतचे सेवक म्हणून काम करा, असा हितोपदेश त्यांनी दिला. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या भेटण्याचा दिवस, वेळ आणि त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा फलक लावा. ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यास ग्रामपातळीवर काम करणाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. यावेळी अन्नसुरक्षा योजनेची प्रभावी अमलबजावणी, सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची अमलबजावणी करण्यावर भर देऊन विविध यंत्रणेने समन्वयातून प्रभावी परिणाम दाखविण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी महाजन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी विभाग आदींनी आपापल्या विभागांच्या योजनांची माहिती पीपीपीव्दारे दिली. कार्यशाळेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. दरम्यान, वेणूताई बबन सरोदे या शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीचा धनादेश दिला. (तालुका प्रतिनिधी)